शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याची भीती अनाठायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 05:36 IST

एमआयईबी; वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, शिक्षणतज्ज्ञांच्या संमिश्र प्रतिक्रिया

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. मात्र आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या नावाखाली अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असून इयत्ता चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा भाग वगळण्यात आला आहे. यावर इतिहासकार, तज्ज्ञ शिक्षक आणि ऐन निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मात्र चौथीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमातील संदर्भ मर्यादित ठेवून पुढे सहावीच्या पुस्तकात त्याची सविस्तर मांडणी करण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम विकसन समितीने स्पष्ट केले आहे.

इतिहासाच्या नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार इतिहासाला सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक आयाम असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन इतिहासाची ओळख एक विषय म्हणून पाचवीपासून करून देण्यात येणार आहे. प्रादेशिक अस्मिता कायम ठेवून राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इयत्ता सहावीमध्ये मांडण्यात येणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला, ही भीती अनाठायी असल्याचे मत मांडण्यात आले.

मात्र मंडळाच्या या निर्णयावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयईबी संस्थेचे संकेतस्थळ नाही. या संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, काम करणारे अधिकारी, संस्थेचा पत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके इत्यादी कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध नाही. शिवाय ही पुस्तकेही सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोपनीयतेबद्दल इतके प्रश्न असताना त्यासंदर्भात खुलासा का केला जात नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी दिली. मुद्दा शिवाजी महाराजांचा इतिहास कधी शिकवायचा हा असेल आणि एससीईआरटीला तो सहावीसाठी योग्य वाटत असेल, तर तसा आदेश शासनाकडून मिळवावा. पण सध्या तरी विधिमंडळाच्या पटलावर जे आहे ते मान्य करायला हवे, असे मत शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांनी शैक्षणिक ग्रुपवर मांडताना व्यक्त केले. नवीन संशोधनानुसार मुलांना इतिहास सहावीत कळणार असेल तर कोणत्या संशोधनानुसार मुलांना पहिलीत संस्कृत भाषा समजेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज