शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दुष्काळाची भीती कायम

By admin | Updated: September 22, 2015 02:16 IST

राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. धरणांमधील वाढलेला पाणीसाठा आणि टँकर व चारा छावण्यांची घटलेली संख्या या बाबी दिलासा देणाऱ्या असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तसेच सोलापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी दिले. पिकांचे ३३ टक्के वा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास टंचाई जाहीर करण्याचे धोरण आहे. हे लक्षात घेता आजही हजारो गावे टंचाईच्या टप्प्यात आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत त्याबाबत आढावा घेण्यात येईल. केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.परतीच्या पावसामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या ७० लाख हेक्टरपर्यंत होतील, असा अंदाज आहे. जलयुक्त शिवार योजनेला या पावसाचा फायदा झाला आहे. सध्याच्या पावसाने बहुतांश जिल्ह्यांत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे; तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत सुधारणा झाली असून, या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १४ सप्टेंबर रोजी एकूण १९९० टँकरद्वारे १५१५ गावे आणि ३२२७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आज ११९० टँकरद्वारे ९०८ गावे आणि १८४२ वाड्यांवर पाणी पुरविले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)