शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीसाठी एफडीए सज्ज

By admin | Updated: October 9, 2016 02:06 IST

सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम

मुंबई : सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम आरोग्यावर झाल्यास सणासुदीला गालबोट लागू शकते. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) दसरा आणि दिवाळीसाठी सज्ज झाले आहे. दसऱ्याला श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम अशा गोड पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे अनेकदा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. खव्यामध्येही भेसळ केली जाते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोकण विभागातील एफडीएच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मिठाईची दुकाने आणि अन्य दुकानांची तपासणी करण्यास सांगितली आहे. या दुकानांतील पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार असल्याची माहिती ठाण्याचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देखमुख यांनी दिली. आॅक्टोबर महिनाअखेर दिवाळी आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात पदार्थांची खरेदी वाढणार आहे. यात तेल आणि तुपाचाही मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे. त्याचबरोबरीने मिठार्इंचा समावेशही असणार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. कारण, त्यात वेगळे असे काही दिसत नाही. या कारणांमुळे या सणासुदीच्या काळात ग्राहकांनीही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन एफडीएने केले आहे. मिठाई खरेदी करताना दुकानाची विश्वासार्हता तपासून पाहा, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)