शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सणासुदीसाठी एफडीए सज्ज

By admin | Updated: October 9, 2016 02:06 IST

सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम

मुंबई : सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम आरोग्यावर झाल्यास सणासुदीला गालबोट लागू शकते. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) दसरा आणि दिवाळीसाठी सज्ज झाले आहे. दसऱ्याला श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम अशा गोड पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे अनेकदा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. खव्यामध्येही भेसळ केली जाते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोकण विभागातील एफडीएच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मिठाईची दुकाने आणि अन्य दुकानांची तपासणी करण्यास सांगितली आहे. या दुकानांतील पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार असल्याची माहिती ठाण्याचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देखमुख यांनी दिली. आॅक्टोबर महिनाअखेर दिवाळी आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात पदार्थांची खरेदी वाढणार आहे. यात तेल आणि तुपाचाही मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे. त्याचबरोबरीने मिठार्इंचा समावेशही असणार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. कारण, त्यात वेगळे असे काही दिसत नाही. या कारणांमुळे या सणासुदीच्या काळात ग्राहकांनीही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन एफडीएने केले आहे. मिठाई खरेदी करताना दुकानाची विश्वासार्हता तपासून पाहा, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)