शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर एफडीएची करडी नजर, खाद्यतेल, गुटख्याचा २५ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:17 IST

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला

- जयंत धुळपअलिबाग : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी दिली आहे.दिवाळी सणाच्या कालावधीत रायगड अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम आखून, अन्न नमुने घेणे, अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६अंतर्गत विश्लेषण करणे, खाद्यपदार्थ विक्रेते, स्टॉलधारक यांची तपासणी करून अनुचित असल्यास कारवाई करणे, अशी कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी सात पथके कार्यान्वित करण्यात आल्याचे संगत यांनी सांगितले.जिल्ह्यात आतापर्यंत खाद्यतेलाचे २९, वनस्पती तुपाचे ८, बेसन, रवा व मैद्याचे १०, मिठाई व खव्याचे १३ व इतर अन्नपदार्थांचे ९ नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.मिठाईमध्ये रंग १०० पीपीएमपेक्षा जास्त नसावामिठाई विक्रेत्यांनी रोज ताजी मिठाई तयार करावी. रंग वापरताना तो १०० पीपीएमपेक्षा जास्त नसावा, खाद्यरंगाचा वापर करावा, असे आवाहन संगत यांनी केले आहे.दिवाळी व सणासुदीच्या काळात ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना बिल घ्यावे, त्याचबरोबर परवानाधारक व नोंदणीधारक व्यावसायिकांंकडूनच मालाची खरेदी करावी. पॅकबंद अन्नपदार्थांवरील लेबलवर उत्पादकाचा पत्ता, उत्पादनाची तारीख, बॅच नं., अन्नपदार्थ वापरण्याची अंतिम तारीख या बाबींचीही शहानिशा करूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, असे संगत यांनी सांगितले.तक्रारीकरिता टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर संपर्क साधा.खाद्यपदार्थांबाबत किंवा मिठाईबाबत काही शंका असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्र. १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांनी अखेरीस केले आहे.

टॅग्स :foodअन्न