शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या २५०० कोटींवर डल्ला मारण्याचा घाट-- कारखान्याचे आर्थिक वर्ष बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 21:34 IST

कोल्हापूर : ऊसदर नियंत्रण समितीची स्थापना ज्या कायद्याने झाली, त्याच कायद्याने निश्चित करून दिलेले साखर कारखानदारीचे आर्थिक वर्ष बदलून ते पूर्वीप्रमाणेच

ठळक मुद्दे ऊसदर मंडळाची २८ ला बैठक एकूण उत्पन्नातील ७० टक्के नफा शेतकºयांना देणे बंधनकारक आहे.कारखान्यांकडे शिल्लक असलेले सुमारे २५०० कोटी रुपये शेतकºयांना मिळणार नाहीतमुख्यत: खासगी कारखाने मात्र एफआरपीवर बोट ठेवून जादाचा फायदा हडप करण्याच्या प्रयत्नात

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ऊसदर नियंत्रण समितीची स्थापना ज्या कायद्याने झाली, त्याच कायद्याने निश्चित करून दिलेले साखर कारखानदारीचे आर्थिक वर्ष बदलून ते पूर्वीप्रमाणेच एक सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तसे केल्याने मागच्या हंगामातील कारखान्यांकडे शिल्लक असलेले सुमारे २५०० कोटी रुपये शेतकºयांना मिळणार नाहीत. येत्या दि. २८ सप्टेंबरला होणाºया ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत यावरून सरकारला जाब विचारण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.

राज्यात २०१६ च्या हंगामात १७९ कारखाने सुरु होते. त्यांनी ७६० लाख टन गाळप केले. या कारखान्यांकडे मार्च २०१६ ला सुमारे ७५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. जो त्यांनी पुढे टनांस सरासरी ५०० रुपयांनी वाढीव दराने विकला. त्यातून किमान ३७०० कोटी रुपये कारखान्यांना उपलब्ध झाले. त्यास ७० : ३० चे सूत्र लागू केल्यास ही रक्कम २५०० कोटी रुपयांपर्यंत जाते. पूर्वीपासून कारखान्यांचे आर्थिक वर्ष हंगामानुसार म्हणजे दि. ३१ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर असे होते परंतु ऊसदर नियंत्रण मंडळ अस्तित्वात आल्यावर इतर उद्योगांप्रमाणेच कारखान्यांचे आर्थिक वर्षही दि. १ एप्रिल ते ३१ मार्च असे करण्यात आले.

हंगाम २०१५ पासून कारखान्यांचे व्यवहार त्यानुसारच होत आहेत. त्यामध्ये दि. ३१ मार्चनंतर जो साखरसाठा शिल्लक असेल त्याचे मूल्यांकन अकौटंट स्टँडर्ड २ नुसार बाजारमूल्य किंवा उत्पादन मूल्य यांतील जे कमी असेल त्यानुसार धरले जावे असे निश्चित करण्यात आले. दि. ३१ मार्च २०१६ ला साखरेचा सरासरी भाव २५०० ते २६०० रुपये होता. त्या हिशेबाने कारखान्यांनी शेतकºयांची एफआरपी अदा केली; परंतु हाच दर पुढे ३२०० रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे कारखान्यांकडे ४ कोटींपासून ५० कोटी रुपयांपर्यंत जादा रक्कम शिल्लक राहिली.

याचा हिशोब १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ च्या आर्थिक वर्षात येणे गरजेचे आहे परंतू तसे न करता आर्थिक वर्ष बदलण्याचे कारस्थान सुरु आहे. रंगराजन समितीने कारखान्याच्या हिशेबामध्ये ७० : ३० चा फॉर्म्युला निश्चित करून दिला आहे. त्यानुसार एकूण उत्पन्नातील ७० टक्के नफा शेतकºयांना देणे बंधनकारक आहे. चांगले सहकारी साखर कारखाने त्यानुसार शेतकºयांना त्यांच्या उसाचा मोबदला देतात परंतु मुख्यत: खासगी कारखाने मात्र एफआरपीवर बोट ठेवून जादाचा फायदा हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत.

सहकार कारखान्यांचे व्यवस्थापन खर्च जास्त असतो तरीही काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा किमान २५० ते ३०० रुपये जादा रक्कम बिलापोटी शेतकºयांना दिली आहे याउलट अपवादवगळता खासगी कारखान्यांनी मात्र दुसरा हप्ता दिलेला नाही. गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याने जो ४४०० रुपये दर दिला तो वाढीव रकमेचा समान हिश्यात देण्याच्या तरतुदीमुळेच. कायद्याने १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक आहे, ते नाही दिले तर त्या रकमेवर व्याज द्यावे अशी तरतूद आहे परंतु ही रक्कमही कधीच दिली जात नाही. उलट कारखान्याच्या ताळेबंदातून हा व्याजाचा कॉलमच गायब झाला आहे. 

कारखान्यांचे आर्थिक वर्ष बदलण्यास स्वाभिमानी संघटनेचा तीव्र विरोध राहील. सरकारने मागच्या हंगामातील कोणतेही हिशेब अजून सादर केलेले नाहीत. तोपर्यंत ऊस दर मंडळाची बैठक बोलावली आहे. मग त्या बैठकीत कशाच्या आधारे उसाचा दर निश्चित करायचा हे कोडेच आहे. सरकारमधीलच काही लोक खासगी कारखान्याच्या हिताचे निर्णय घेत असून ते आम्ही घडू देणार नाही.- अ‍ॅड. योगेश पांडे,प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना