शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी करा म्हणण्याची फॅशन - व्यंकय्या नायडू

By admin | Updated: June 22, 2017 16:12 IST

अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी केली. मात्र केवळ संकटकाळात कर्जमाफीच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
 
पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांची नोंदणी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन गेहलोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
 
यावेळी व्यंकय्या नायडू असेही म्हणाले, "कर्ज घेतले की लगेच कर्ज माफीची मागणी केली जात आहे. मात्र स्वावलंबी बनले पाहिजे. अमेरिकेने मोफत कर्ज दिले तर आपण घेणार का. आता मोफत देण्याचा जमाना गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र देण्याची घोषणा केली जाते. मात्र ते लहान मुलांना लॉलीपॉप दाखवल्यासारखे आहे."
 
आता शहरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करण्यासाठी शहरांनीच निधी उभा करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने घेतलेल्या कर्जरोख्यांमुळे विकासाचा नवा मार्ग खुला झाला आहे,असे व्यकंय्या नायडू यांनी सांगितले.
 
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षात २३०० कोटी रुपये पुणे महापालिका कर्जरोख्यांद्वारे उभारणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २०० कोटी रुपये गुरुवारी कर्ज रोख्यातून उभारण्यात आले आहेत. यानिमित्ताने मुंबई शेअर बाजारात झालेल्या कर्ज रोख्यांची नोंदणी करण्याच्या कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव राजीव गौबा, राज्याचे प्रधान सचिव सुमित मलिक, अतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.