शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

कर्जमाफी करा म्हणण्याची फॅशन - व्यंकय्या नायडू

By admin | Updated: June 22, 2017 16:12 IST

अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी केली. मात्र केवळ संकटकाळात कर्जमाफीच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
 
पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांची नोंदणी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन गेहलोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
 
यावेळी व्यंकय्या नायडू असेही म्हणाले, "कर्ज घेतले की लगेच कर्ज माफीची मागणी केली जात आहे. मात्र स्वावलंबी बनले पाहिजे. अमेरिकेने मोफत कर्ज दिले तर आपण घेणार का. आता मोफत देण्याचा जमाना गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र देण्याची घोषणा केली जाते. मात्र ते लहान मुलांना लॉलीपॉप दाखवल्यासारखे आहे."
 
आता शहरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करण्यासाठी शहरांनीच निधी उभा करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने घेतलेल्या कर्जरोख्यांमुळे विकासाचा नवा मार्ग खुला झाला आहे,असे व्यकंय्या नायडू यांनी सांगितले.
 
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षात २३०० कोटी रुपये पुणे महापालिका कर्जरोख्यांद्वारे उभारणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २०० कोटी रुपये गुरुवारी कर्ज रोख्यातून उभारण्यात आले आहेत. यानिमित्ताने मुंबई शेअर बाजारात झालेल्या कर्ज रोख्यांची नोंदणी करण्याच्या कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव राजीव गौबा, राज्याचे प्रधान सचिव सुमित मलिक, अतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.