शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कर्जमाफी करा म्हणण्याची फॅशन - व्यंकय्या नायडू

By admin | Updated: June 22, 2017 16:12 IST

अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी केली. मात्र केवळ संकटकाळात कर्जमाफीच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
 
पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांची नोंदणी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन गेहलोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
 
यावेळी व्यंकय्या नायडू असेही म्हणाले, "कर्ज घेतले की लगेच कर्ज माफीची मागणी केली जात आहे. मात्र स्वावलंबी बनले पाहिजे. अमेरिकेने मोफत कर्ज दिले तर आपण घेणार का. आता मोफत देण्याचा जमाना गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र देण्याची घोषणा केली जाते. मात्र ते लहान मुलांना लॉलीपॉप दाखवल्यासारखे आहे."
 
आता शहरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करण्यासाठी शहरांनीच निधी उभा करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने घेतलेल्या कर्जरोख्यांमुळे विकासाचा नवा मार्ग खुला झाला आहे,असे व्यकंय्या नायडू यांनी सांगितले.
 
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षात २३०० कोटी रुपये पुणे महापालिका कर्जरोख्यांद्वारे उभारणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २०० कोटी रुपये गुरुवारी कर्ज रोख्यातून उभारण्यात आले आहेत. यानिमित्ताने मुंबई शेअर बाजारात झालेल्या कर्ज रोख्यांची नोंदणी करण्याच्या कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव राजीव गौबा, राज्याचे प्रधान सचिव सुमित मलिक, अतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.