शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

यवतमाळमधील शेतकरी मृत्यूस कृषी अधिकारी जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:22 IST

कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे.

- योगेश बिडवई।मुंबई : कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे. कृषी मंत्रालयाने कृषी अधीक्षक व जिल्हा परिषदेचे कृषी विकास व इतर संबंधित अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.बेजबाबदार अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न कृषी विभागाने विचारला आहे. कीटकनाशके हाताळताना विषबाधा झाल्यास त्याची माहिती पाठविण्याची जबाबदारी मुख्य पीक संरक्षण अधिकाºयाकडे असते. कीटकनाशके हाताळण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे आवश्यक होते, तसे घडले नाही.अधिकाºयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली नाही. प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या नाहीत. शेतकºयांच्या मृत्यूची गंभीर घटनाही निष्काळजीपणाने दुर्लक्षित करण्यात आली. विषबाधेनंतर शेतकरी मेळावे, प्रशिक्षण घेण्यात आले नाहीत,असा ठपकाही कृषी विभागाने ठेवला आहे.कृषी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे ४५० पेक्षा अधिक शेतकºयांना विषबाधा झाल्यानंतरही त्याची योग्य माहिती विभागाला पात्र झाली नाही. त्याचा कोणताही अहवाल न येणे हे गंभीर असल्याचे उपसचिव सु. सं. धपाटे यांनी नोटीशीत म्हटले आहे.यांच्यावर होणार कारवाई?क्रॉपसॅकचे स्काऊटस्, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी गावाला भेट न दिल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याचे नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी