शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भाज्यांचे दर कोसळल्याने शेतकरी चिंताग्रस्त; ८० टन भाजी एपीएमसीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 23:05 IST

अलिबागमधील तोंडलीला भावच नाही

कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शेतकरी हंगामी भाजीपाल्याचे दर कोसळल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. अलिबाग तालुक्यात या हंगामात वाल, घेवडा, तोंडली, कारली, दुधी, घोसाळी, पडवळ आदी प्रकारची भाजी मोठ्या प्रमाणात काढली जाते. अलिबाग तालुक्यातून ८० टन भाजी रोज वाशी येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जाते. दरवर्षी चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो, परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच भाजीचे दर कमी आहेत.

यंदा पावसाळा लांबला त्यामुळे उन्हाळ्यातील भाज्यांची लागवड करण्यास उशीर झाला. एक महिना उशिरा भाजीपाला उत्पादन होऊनसुद्धा भाज्यांचे दर वाशी बाजारात कमी मिळत आहेत. बी-बियाणे, खते, औषधे याचा खर्चसुद्धा यंदा शेतकऱ्यांना निघणार नसल्याने ते चिंतेत आहेत.

गेल्या वर्षी याच वेळी वीस ते तीस रुपये प्रतिकिलो दर होता, मात्र या वर्षी चार ते पाच रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी राजा कसा तगणार या चिंतेत पडला आहे. अलिबागची तोंडली जगप्रसिद्ध आहे. तरीसुद्धा या वर्षी बाजारभाव मिळत नाही. वाशी येथे भाज्यांची आवक जास्त वाढल्याने सर्व भाज्यांचे भाव गडगडले आहेत, असे मत या बाजार समितीमधील व्यापाºयांचे आहे.यंदा पाऊस सर्वत्र पडल्यामुळे भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. तसेच कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात भाजीची आवक वाढली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच भाज्यांचे दर कमी झाले आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईया वर्षी भाजीपाल्याला चांगला दर नसल्याने आमच्या खर्चाची रक्कमसुद्धा वसूल होणार नाही, याची चिंता सतावत आहे. - मधुकर पाटील, शेतकरीभाजी उत्पादनात वाढ झाल्याने मुंबई येथे योग्य दर मिळत नाही. आम्ही शेतकºयांना अदा केलेली रक्कम वसूल होणार नसल्याने आम्हालासुद्धा या वर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - संदीप पाटील, स्थानिक व्यापारी