शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शेतक-यांची दिवाळी होणार गोड - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:42 IST

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.

जळगाव : राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.जैन इरिगेशन सिस्टीम लि. प्रस्तुत ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी येथे झाला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. खान्देशातील २५ शेतकºयांना ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कारने गौरविण्यात आले.‘नदीजोड’चे लवकरच मोठे कामगिरीश महाजन म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दरवर्षी कोठे फारच कमी तर कोठे खूपच जास्त पाऊस होतो. त्यामुळे सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जात आहे. नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा मंत्रिपद आल्याने महाराष्ट्राची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. राज्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असून दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर हे काम झालेले असेल. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मोठी मदत होईल.५ लाख सौरपंप शासन देणारवीज प्रश्नावर मात करण्यास शासन शेतकºयांना ५ लाख सौरउर्जा पंपांचे वितरण करणार आहे. सर्व फिडरही सौर उर्जेने जोडण्यात येणार आहेत. शेतकºयांना सौर पंपासाठी अनुदान दिले जाते. जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पाटाच्या पाण्यावरही वीज निर्मितीचे धोरण असून शासनाचे शाश्वत शेतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी