शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतक-यांची दिवाळी होणार गोड - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:42 IST

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.

जळगाव : राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.जैन इरिगेशन सिस्टीम लि. प्रस्तुत ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी येथे झाला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. खान्देशातील २५ शेतकºयांना ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कारने गौरविण्यात आले.‘नदीजोड’चे लवकरच मोठे कामगिरीश महाजन म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दरवर्षी कोठे फारच कमी तर कोठे खूपच जास्त पाऊस होतो. त्यामुळे सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जात आहे. नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा मंत्रिपद आल्याने महाराष्ट्राची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. राज्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असून दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर हे काम झालेले असेल. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मोठी मदत होईल.५ लाख सौरपंप शासन देणारवीज प्रश्नावर मात करण्यास शासन शेतकºयांना ५ लाख सौरउर्जा पंपांचे वितरण करणार आहे. सर्व फिडरही सौर उर्जेने जोडण्यात येणार आहेत. शेतकºयांना सौर पंपासाठी अनुदान दिले जाते. जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पाटाच्या पाण्यावरही वीज निर्मितीचे धोरण असून शासनाचे शाश्वत शेतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी