शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेततळयांचे गाव घाटा

By admin | Updated: January 18, 2017 09:00 IST

केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. १८ -  वाशिम येथून जवळच असलेल्या दळणवळणाचा योग्य रस्ता नसलेल्या व केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला. शेततळ्याचा एवढा मोठा लाभ घेणारे जिल्हयातील हे एकमेव गाव ठरले आहे. येथील शेतकऱ्यांच्या पुढाकाराने इतरही गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आज येथील शेतकरी या शेततळयाच्या आधारावर विविध प्रकारची पीके घेऊन स्वावलंबी झाला आहे.या कामासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी के.एस. गावधाने , उपविभागीय कृषी अधिकारी मुरली इंगळे, कृषी सहायक डी.के. रणवीर, बँक शाखा व्यवस्थापक बी.एस. जाधव, निरिक्षक के. एस. गायकवाड यांनी परिश्रम घेवून पाठपुरावा करुन मोलाचे मार्गदर्शन केले. या शेततळयांचय आधारावर शेतकऱ्यांनी मिरची, टमाटे व काकडी अशी लागवड केली. यामधून शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फायदा होत आहे. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून बरेच शेतकरी शेततळे घेण्यासाठी उत्सूक आहेत. घोटा गावामध्ये शेडनेटचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ७ शेतकरी अल्पभुधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे हे विशेष!मागेल त्याला शेततळे योजनेचा फायदामागेल त्याला शेततळे योजनेचा घोटा या गावाने पुरेपुर फायदा केल्याने आज येथे शेतकऱ्यांच सिंचनाचा प्रश्न मिटत आहे. काही शेतकऱ्यांनी तर मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले आहे यामधून दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न घेणे सुरु केले आहे. योग्य नियोजन व कृषी विभागाचे सहकार्य तसेच बँकेने केलेल्या सहकायार्मुळे धोटा येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा फायदा घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे कार्य पाहता इतरही शेतकरी या योजनेच्या फायदयासाठी सरसावला आहे.आकारानुसार शेततळयासाठी खर्चघोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .

आकारानुसार शेततळयातून होणारे सिंचन घोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .

कृषी विभागाच्या योजनेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने व इच्छेने हे शक्य झाले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्य करण्यात आले. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कायार्मुळे इतर शेतकरी आता पुढे येत आहेत.- डी.के. रणवीर कृषी सहायक, घोटा