शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेततळयांचे गाव घाटा

By admin | Updated: January 18, 2017 09:00 IST

केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. १८ -  वाशिम येथून जवळच असलेल्या दळणवळणाचा योग्य रस्ता नसलेल्या व केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला. शेततळ्याचा एवढा मोठा लाभ घेणारे जिल्हयातील हे एकमेव गाव ठरले आहे. येथील शेतकऱ्यांच्या पुढाकाराने इतरही गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आज येथील शेतकरी या शेततळयाच्या आधारावर विविध प्रकारची पीके घेऊन स्वावलंबी झाला आहे.या कामासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी के.एस. गावधाने , उपविभागीय कृषी अधिकारी मुरली इंगळे, कृषी सहायक डी.के. रणवीर, बँक शाखा व्यवस्थापक बी.एस. जाधव, निरिक्षक के. एस. गायकवाड यांनी परिश्रम घेवून पाठपुरावा करुन मोलाचे मार्गदर्शन केले. या शेततळयांचय आधारावर शेतकऱ्यांनी मिरची, टमाटे व काकडी अशी लागवड केली. यामधून शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फायदा होत आहे. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून बरेच शेतकरी शेततळे घेण्यासाठी उत्सूक आहेत. घोटा गावामध्ये शेडनेटचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ७ शेतकरी अल्पभुधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे हे विशेष!मागेल त्याला शेततळे योजनेचा फायदामागेल त्याला शेततळे योजनेचा घोटा या गावाने पुरेपुर फायदा केल्याने आज येथे शेतकऱ्यांच सिंचनाचा प्रश्न मिटत आहे. काही शेतकऱ्यांनी तर मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले आहे यामधून दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न घेणे सुरु केले आहे. योग्य नियोजन व कृषी विभागाचे सहकार्य तसेच बँकेने केलेल्या सहकायार्मुळे धोटा येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा फायदा घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे कार्य पाहता इतरही शेतकरी या योजनेच्या फायदयासाठी सरसावला आहे.आकारानुसार शेततळयासाठी खर्चघोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .

आकारानुसार शेततळयातून होणारे सिंचन घोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .

कृषी विभागाच्या योजनेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने व इच्छेने हे शक्य झाले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्य करण्यात आले. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कायार्मुळे इतर शेतकरी आता पुढे येत आहेत.- डी.के. रणवीर कृषी सहायक, घोटा