शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

राज्यात १,३२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जमाफीच्या निर्णयानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने कृषिउत्पादनात वाढ झाली . मात्र शेतीमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. शेतीमालाच्या आयातीचा देखील फटका बसला.जानेवारी २०१७ ते मे २०१७ या पाच महिन्यात कोकणात १, नाशिक विभाग १८१, पुणे ३६, मराठवाडा ३८०, अमरावती ४२६ तर नागपूर विभागात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जून २०१७ मध्ये २१७ शेतकरी आत्महत्या झाल्या. राज्यात २०१५ मध्ये ३ हजार २६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१६ मध्ये हा आकडा ३ हजार ६३ इतका होता. त्यातील पहिल्या सहा महिन्यात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी देण्याची मुख्य मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने अलिकडेच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ८५ टक्के आत्महत्या या शेतीवर संपूर्णत: शेतीवरच उपजिविका असलेल्या शेतकऱ्यांनी केल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शेतीवर अवलंबित्व असलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आत्महत्येची आकडेवारी२०१७२०१६जानेवारी२०३२५२फेब्रुवारी२०५२२८मार्च २५७२६७एप्रिल१९०२७६मे २५५२७०जून२१७२४८एकूण१३२७१५४१