शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यात १,३२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जमाफीच्या निर्णयानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने कृषिउत्पादनात वाढ झाली . मात्र शेतीमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. शेतीमालाच्या आयातीचा देखील फटका बसला.जानेवारी २०१७ ते मे २०१७ या पाच महिन्यात कोकणात १, नाशिक विभाग १८१, पुणे ३६, मराठवाडा ३८०, अमरावती ४२६ तर नागपूर विभागात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जून २०१७ मध्ये २१७ शेतकरी आत्महत्या झाल्या. राज्यात २०१५ मध्ये ३ हजार २६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१६ मध्ये हा आकडा ३ हजार ६३ इतका होता. त्यातील पहिल्या सहा महिन्यात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी देण्याची मुख्य मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने अलिकडेच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ८५ टक्के आत्महत्या या शेतीवर संपूर्णत: शेतीवरच उपजिविका असलेल्या शेतकऱ्यांनी केल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शेतीवर अवलंबित्व असलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आत्महत्येची आकडेवारी२०१७२०१६जानेवारी२०३२५२फेब्रुवारी२०५२२८मार्च २५७२६७एप्रिल१९०२७६मे २५५२७०जून२१७२४८एकूण१३२७१५४१