शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 11:05 IST

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शेतकरी आत्महत्येवर गाजणार असच दिसत आहे. राज्यातील नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांना वाचा फोडली.

नवनीत राणा म्हणाल्या की, शहरांना बाजुला ठेवून ग्रामीण महाराष्ट्रावर आपण चर्चा करूया. एकेकाळी महाराष्ट्राची ओळख वेगळी होती. परंतु, आता महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. देशात मागील ४० वर्षांत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. यापैकी ८० हजार शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले.

यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवन मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.