शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

लूट थांबविण्यासाठी शेतकरी व्हायला हवा व्यापारी

By नामदेव मोरे | Updated: July 29, 2024 10:39 IST

ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

नामदेव मोरे, उपमुख्य उपसंपादक

कृषी व्यापारात मध्यस्थांच्या वाढलेल्या साखळीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांचीही पिळवणूक होत आहे. साखळी तोडण्यासाठी शासकीय धोरणांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकरी व्यापारी झाला पाहिजे. पिकवणाऱ्याला विकता आले पाहिजे. दुसरीकडे, ग्राहक जागा झाला पाहिजे. ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना विकता आले पाहिजे

शेतकरी भाजीपाल्याची लागवड करण्यापासून ते प्रत्यक्ष भाजीपाला काढेपर्यंत दोन ते चार महिने दिवसरात्र मेहनत करतात; पण मालाची काढणी झाली की त्याची थेट ग्राहकाऐवजी मध्यस्थाला विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना २५ रुपये किलो भाव मिळाला तर ग्राहकांना त्यासाठी १२५ रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांनी स्वत: किंवा शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी आठवडी बाजार, बाजार समिती, गृहनिर्माण सोसायट्या, कारखाने, कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर मालाची विक्री केली तर त्यांना जास्त लाभ होऊ शकतो. शेतकरी स्वत: व्यापारी झाला तर मध्यस्थांची साखळी तोडणे शक्य होऊ शकते. शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

मध्यस्थांची अमर्याद साखळी

खेडेगावातील शेतकऱ्यांच्या मालाचे संकलन तेथील एखादी मध्यस्थ करतो. तो माल स्थानिक बाजार समितीमध्ये विक्री केला जातो. तेथून व्यापारी तो मुंबई बाजार समितीमध्ये पाठवितात. बाजार समितीमधून किरकोळ विक्रेता व काही वेळा मोठ्या किरकोळ विक्रेत्यांकडून पदपथावरील विक्रेत्याकडे व नंतर ग्राहकाकडे जातो. शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये चार ते पाच मध्यस्थ, तीन वेळा वाहतूक खर्च व तीन वेळा चढ-उतार करण्याची मजुरी द्यावी लागते. यामुळे शेतकऱ्याला मिळणाऱ्या मालापेक्षा ग्राहकाला चार ते पाचपट किंमत मोजावी लागते.

हापूससह फुल शेतकऱ्यांचा प्रयत्न

दसरा व दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. पूर्वी शेतकरी होलसेल व्यापाऱ्यांकडे फुले पाठवायचे; पण योग्य भाव मिळायचा नाही. मागील काही वर्षांत शेतकरी स्वत:च नवी मुंबई, मुंबईमध्ये येऊन फुलांची विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व ग्राहकांना स्वस्त फुले मिळतात. कोकणातील आंबा उत्पादकही आता आंबा महोत्सवासह थेट विक्रीची साखळी तयार करत असून, बाजार समितीला पर्यायी यंत्रणा उभी करू लागले असून, या आंबाविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हीच यंत्रणा भाजीपाल्यासाठी सुरू व्हावी.

धोरणांची हवी अंमलबजावणी

मध्यस्थांची साखळी तोडण्यासाठी शासनाने २००६ मध्ये मॉडेल ॲक्ट मंजूर केला. २०१६ मध्ये भाजीपाला नियमनमुक्त केला. थेट पणनची योजना सुरू केली. शेतकरी आठवडी बाजार सुरू केले. या चारही योजना मध्यस्थांची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात; पण त्याची योग्य अंमलबजावणीच होत नाही. थेट पणनचा दुरुपयोग सुरू आहे. दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. ‘शेतकरी बाजार’ची संख्या वाढत नाही.

ग्राहक जागा झाला पाहिजे

मुंबईतील ग्राहक चळवळ मृतावस्थेकडे चालली आहे. शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी त्यांचे गट तयार केले पाहिजेत. त्याच धर्तीवर ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी गट तयार करून घाऊक खरेदी केली पाहिजे. सोसायटीनिहाय, काॅर्पोरेट कंपनी, शासकीय कार्यालयनिहाय गट तयार झाले तरी कमी दरात भाजीपाला खरेदी करणे थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवून देता येणे शक्य आहे. ग्राहक जागा झाला तरी महागाई नियंत्रणात येऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र