शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

लूट थांबविण्यासाठी शेतकरी व्हायला हवा व्यापारी

By नामदेव मोरे | Updated: July 29, 2024 10:39 IST

ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

नामदेव मोरे, उपमुख्य उपसंपादक

कृषी व्यापारात मध्यस्थांच्या वाढलेल्या साखळीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांचीही पिळवणूक होत आहे. साखळी तोडण्यासाठी शासकीय धोरणांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकरी व्यापारी झाला पाहिजे. पिकवणाऱ्याला विकता आले पाहिजे. दुसरीकडे, ग्राहक जागा झाला पाहिजे. ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना विकता आले पाहिजे

शेतकरी भाजीपाल्याची लागवड करण्यापासून ते प्रत्यक्ष भाजीपाला काढेपर्यंत दोन ते चार महिने दिवसरात्र मेहनत करतात; पण मालाची काढणी झाली की त्याची थेट ग्राहकाऐवजी मध्यस्थाला विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना २५ रुपये किलो भाव मिळाला तर ग्राहकांना त्यासाठी १२५ रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांनी स्वत: किंवा शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी आठवडी बाजार, बाजार समिती, गृहनिर्माण सोसायट्या, कारखाने, कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर मालाची विक्री केली तर त्यांना जास्त लाभ होऊ शकतो. शेतकरी स्वत: व्यापारी झाला तर मध्यस्थांची साखळी तोडणे शक्य होऊ शकते. शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

मध्यस्थांची अमर्याद साखळी

खेडेगावातील शेतकऱ्यांच्या मालाचे संकलन तेथील एखादी मध्यस्थ करतो. तो माल स्थानिक बाजार समितीमध्ये विक्री केला जातो. तेथून व्यापारी तो मुंबई बाजार समितीमध्ये पाठवितात. बाजार समितीमधून किरकोळ विक्रेता व काही वेळा मोठ्या किरकोळ विक्रेत्यांकडून पदपथावरील विक्रेत्याकडे व नंतर ग्राहकाकडे जातो. शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये चार ते पाच मध्यस्थ, तीन वेळा वाहतूक खर्च व तीन वेळा चढ-उतार करण्याची मजुरी द्यावी लागते. यामुळे शेतकऱ्याला मिळणाऱ्या मालापेक्षा ग्राहकाला चार ते पाचपट किंमत मोजावी लागते.

हापूससह फुल शेतकऱ्यांचा प्रयत्न

दसरा व दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. पूर्वी शेतकरी होलसेल व्यापाऱ्यांकडे फुले पाठवायचे; पण योग्य भाव मिळायचा नाही. मागील काही वर्षांत शेतकरी स्वत:च नवी मुंबई, मुंबईमध्ये येऊन फुलांची विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व ग्राहकांना स्वस्त फुले मिळतात. कोकणातील आंबा उत्पादकही आता आंबा महोत्सवासह थेट विक्रीची साखळी तयार करत असून, बाजार समितीला पर्यायी यंत्रणा उभी करू लागले असून, या आंबाविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हीच यंत्रणा भाजीपाल्यासाठी सुरू व्हावी.

धोरणांची हवी अंमलबजावणी

मध्यस्थांची साखळी तोडण्यासाठी शासनाने २००६ मध्ये मॉडेल ॲक्ट मंजूर केला. २०१६ मध्ये भाजीपाला नियमनमुक्त केला. थेट पणनची योजना सुरू केली. शेतकरी आठवडी बाजार सुरू केले. या चारही योजना मध्यस्थांची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात; पण त्याची योग्य अंमलबजावणीच होत नाही. थेट पणनचा दुरुपयोग सुरू आहे. दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. ‘शेतकरी बाजार’ची संख्या वाढत नाही.

ग्राहक जागा झाला पाहिजे

मुंबईतील ग्राहक चळवळ मृतावस्थेकडे चालली आहे. शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी त्यांचे गट तयार केले पाहिजेत. त्याच धर्तीवर ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी गट तयार करून घाऊक खरेदी केली पाहिजे. सोसायटीनिहाय, काॅर्पोरेट कंपनी, शासकीय कार्यालयनिहाय गट तयार झाले तरी कमी दरात भाजीपाला खरेदी करणे थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवून देता येणे शक्य आहे. ग्राहक जागा झाला तरी महागाई नियंत्रणात येऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र