शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पुणतांब्यात शेतक-यांचा दिवाळीत पुन्हा एल्गार, देशव्यापी लढ्यासाठी २० आॅक्टोबरला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:44 IST

राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नांवर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.

पुणतांबा (अहमदनगर) : राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नांवर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.राज्यात शेतकरी आंदोलनाची ज्योत पेटविणा-या किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी ही माहिती दिली. देशव्यापी लढ्याचे नियोजन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणतांबा पुन्हा चळवळीचे केंद्र ठरणार आहे. राज्यातील शेतकºयांच्याअभूतपूर्व संपाला १ जूनपासून पुणतांब्यातून सुरुवात झाली होती. त्याचे लोण राज्यात पोहोचवून सरकारला दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर करावी लागली.पुणतांब्यातील शेतकरी संपाची धग राज्यभरात पसरली. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र म्हणून पुणतांब्याचे नाव राज्यभरात पोहोचले. कर्जमाफी जाहीर झाली असली, तरी शेतकºयांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबितआहेत. त्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. त्याच्या नियोजनासाठी २० आॅक्टोबरला पुणतांब्यात देशव्यापी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याचे जाधव यांनी सांगितले.किसान क्रांतीच्या वतीने विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर टाळून गावराण बियाण्यांचा वापर करावा, हे घोषवाक्य फलकावर लिहिले होते. या वेळी जाधव म्हणाले, १ जूनच्या संपामुळे मोठी क्रांती झाली. त्यामुळे राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आता रासायनिक खतांचा वापर न करता गावरान बियाणे वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शेतात राबणाराशेतकरी घाम गाळत असूनव्यापारी, उद्योजक मालामाल झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी