शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

गोहत्या बंदीसाठी शेतकरी स्वावलंबन गरजेचे -अभय बंग

By admin | Updated: August 19, 2015 00:46 IST

देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे.

पवनार (वर्धा) : देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे गोहत्या बंदीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे स्वावलंबन गरजेचे आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत गोहत्या बंदीला संपूर्ण यश मिळणार नाही, असे मत डॉ. अशोक बंग यांनी व्यक्त केले. गोवंश हत्याबंदी व्हावी, यासाठी दिल्लीत सत्याग्रह सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पवनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात विचारमंथन कार्यक्रमात डॉ. बंग बोलत होते. एका बैलजोडीने ४-५ वर्षे काम केल्यानंतर पुढील ३-४ वर्षे तिचे निव्वळ पालनपोषण करावे लागते. यासाठी येणारा खर्च झेपणारा नसतो. म्हणून त्या जनावरांची रवानगी कत्तलखान्याकडे होते. अशा जनावरांसाठी गोशाळा निर्माण झाल्या तरी त्या पुरेशा नाहीत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. कामायोग्य नसलेल्या जनावरांचे पालनपोषण तो करू शकत नाही, असेही ते म्हणाले. मंगळवारच्या चर्चासत्राचे अध्यक्ष खुदाई खिदमद्गारचे फैसलभाई यांनी सर्वोदय वाचविण्यासाठी गोवंश वाचविणे गरजेचे आहे परखड मत व्यक्त केले. गोहत्या कुण्या जाती-धर्माशी निगडीत नसून ती विचारांशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कुराणातले अनेक दाखलेही दिले.