शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गोहत्या बंदीसाठी शेतकरी स्वावलंबन गरजेचे -अभय बंग

By admin | Updated: August 19, 2015 00:46 IST

देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे.

पवनार (वर्धा) : देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे गोहत्या बंदीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे स्वावलंबन गरजेचे आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत गोहत्या बंदीला संपूर्ण यश मिळणार नाही, असे मत डॉ. अशोक बंग यांनी व्यक्त केले. गोवंश हत्याबंदी व्हावी, यासाठी दिल्लीत सत्याग्रह सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पवनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात विचारमंथन कार्यक्रमात डॉ. बंग बोलत होते. एका बैलजोडीने ४-५ वर्षे काम केल्यानंतर पुढील ३-४ वर्षे तिचे निव्वळ पालनपोषण करावे लागते. यासाठी येणारा खर्च झेपणारा नसतो. म्हणून त्या जनावरांची रवानगी कत्तलखान्याकडे होते. अशा जनावरांसाठी गोशाळा निर्माण झाल्या तरी त्या पुरेशा नाहीत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. कामायोग्य नसलेल्या जनावरांचे पालनपोषण तो करू शकत नाही, असेही ते म्हणाले. मंगळवारच्या चर्चासत्राचे अध्यक्ष खुदाई खिदमद्गारचे फैसलभाई यांनी सर्वोदय वाचविण्यासाठी गोवंश वाचविणे गरजेचे आहे परखड मत व्यक्त केले. गोहत्या कुण्या जाती-धर्माशी निगडीत नसून ती विचारांशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कुराणातले अनेक दाखलेही दिले.