शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 02:36 IST

उद्धव ठाकरे यांनी साधला भाजपावर निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर पडून असताना शासनाची तूर खरेदीची घोषणा केवळ दिशाभूल करणारी आहे. शेतकऱ्यांप्रती शासन प्रचंड उदासीन असल्याचे यावरू न अधोरेखित होत असून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, मागण्यांवर कोणतीच प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सांगून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाना साधला. शिवसेना शेतकऱ्यांसोबत असून, कर्जमुक्ती होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सोमवारी येथे ठणकावून सांगितले.शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना नेते,आमदार तसेच नगरसेवकांनी पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भातील वस्तूनिष्ठ अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. या सर्व अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका विषद केली. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष बांधणी केली जात असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाच्या पुढील वाटचालीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तूर खरेदीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी शासनाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. तूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले; पण तूर खरेदीचे शासनाने कोणतेच नियोजन केले नाही. नाफेडद्वारा राज्यात तूर खरेदी सुरू होती; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ती बंद करण्यात आली. शिवसेनेने यासाठी आंदोलन उभारले. तेव्हा कुठे नाफेडने ३१ मे पर्यंत १ लाख क्विंटल तूर खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले; पण पंचनामा केलेल्या तुरीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या घरातील तूर खरेदी केली जात नसल्याचे सांगत भाजपच्या धोरणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मला शेतीतलं काही कळत नाही,असं बोलल्या जातं. मी कृषीतज्ज्ञ नसलो, तरी शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण शिवसेनेला असल्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो, तरी सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या व्यथा, अपेक्षा व्यक्त करतोय, याचा अर्थ भाजपला विरोध करतो, असा होत नसल्याची पुष्टीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जोडली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला पर्यावरण मंत्री रामदास कदम, खा. अरविंद सावंत, खा.विनायक राऊत, खा.प्रतापराव जाधव, खा.आनंदराव अडसूळ, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आ.गोपीकिशन बाजोरिया उपस्थित होते. नाशिकच्या मेळाव्यात शेतकरी बोलतील!सरकार कोणतेही असो, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे अशी त्यांची भावना असते. आम्ही सत्तेत राहून तीच जबाबदारी निभावतोय. त्यामुळे जरा धीर धरा, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत्या १९ मे रोजी नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन केल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नाशिकच्या मेळाव्यात नेत्यांपेक्षा शेतकरीच अधिक बोलतील, असे सांगत नाशिक येथे सेनेच्या पुढील नव्या अभियानाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जलयुक्त शिवार’मधील दरोडेखोरांना बाहेर काढू!अधिकारी-कंत्राटदारांच्या मिलीभगतमुळे जलयुक्त शिवार अभियानला गालबोट लागले. तत्कालीन सरकारचा सिंचन घोटाळा आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या घोटाळ््यात बरेच साम्य आहे. काळजी करू नका, ‘जलयुक्त शिवार’मधील दरोडेखोरांना आम्ही नक्की बाहेर काढू, असा इशारा नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. ‘संवाद’व्हावा, फक्त शिवीगाळ नको!शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानचा धसका घेत भाजपाने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी २५ मेपासून ‘शिवार-संवाद’ यात्रेचे आयोजन केल्याचे उद्धव ठाकरे यांना विचारले असता शेतकऱ्यांशी संवाद जरूर व्हावा, फक्त शिवीगाळ नको, म्हणजे कमावलं, असा मार्मिक टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता लगावला. सरकारच्या कॅशलेस धोरणावर टीका करत कॅशलेसचा व्यवहार फसला असतानाच आता एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे त्यांनी सांगितले.