शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन हजारो सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 06:57 IST

श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल ...

श्रीनिवास भोसलेलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल झालेेले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, उद्योजक, युवक अशा सर्व घटकांतील नागरिक ‘तिरंगा’ ध्वज घेऊन सहभागी झाले होते. हजारो नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग राहुल गांधींसह यात्रेकरूंचा उत्साह वाढविणारा ठरला. सोमवारी रात्री उशिरा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा तेलंगणातून देगलूर शहरात दाखल झाली. यात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढच्या दिशेने निघाली. गुरुनानक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वेन्नाळी येथे गुरुद्वारा येथे राहुल यांनी दर्शन घेतले. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास वेन्नाळी येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी यात्रेत नागरिकांची संख्या दुपटीने वाढली. वेन्नाळी येथून आटकळीमार्गे बिलोली तालुक्यातील खतगाव फाटाकडे यात्रा मार्गस्थ झाली. वाटेत आटकळी येथे शेकडो ग्रामस्थ, शेतमजूर कामे आटोपून यात्रेत दाखल झाले. विद्यार्थी, युवकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा सादर केल्या. 

द्वेषाचे राजकारण; भावाभावात भांडणंभोपाळा येथे सायंकाळी राहुल यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. भावाभावांत भांडणे लावली जात आहेत. देशातील काही लोकांचे धन दुप्पट होते, मग आमचं का नाही? काही वर्षांपूर्वी याच दिवशी नोटबंदी आणली होती. नोटबंदीने छोटे व्यापारी, शेतकऱ्यांवर आफत आणली. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी