शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर!

By admin | Updated: February 19, 2015 01:47 IST

राज्य सरकारकडून अद्याप कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे़

नितीन अग्रवाल - नवी दिल्लीसततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या महाराष्ट्रातील २ हजार ७३१ शेतकऱ्यांच्या आश्रितांना राज्य सरकारकडून अद्याप कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे़ आयोगाने यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली असून दोन आठवड्यात याचे उत्तर देण्याचे बजावले आहे़प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर आयोगाने ही नोटीस बजावली आहे़ गत चार वर्षांत आत्महत्या करणाऱ्या २७३१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमाअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची लहानशी मदतही दिली गेलेली नाही़ यावर आयोगाने आपल्या नोटीसमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ राज्य सरकारकडून याआधीही अशाच प्रकारच्या पाच अन्य प्रकरणांबाबत माहिती मागण्यात आली होती़ मात्र राज्य सरकारने ही माहिती अद्याप दिलेली नाही, याकडेही आयोगाने लक्ष वेधले आहे आहे़ संबंधित नोटीसमध्ये आयोगाने एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून मागितलेल्या आकडेवारीचा हवाला दिला आहे़ त्यानुसार, सन २०११ मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील ५६९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यापैकी २७३१ शेतकऱ्यांच्या विधवांना अद्यापही कुठलीही मदत दिली गेलेली नाही़ आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकासाठी बँकेचे कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नव्हते किंवा त्यांच्याकडे जमीन नव्हती, या सबबीवर त्यांना सरकारी मदत नाकारण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आश्रितांना नुकसानभरपाई देण्याच्या विद्यमान नियमांची तात्काळ समीक्षा करण्याची गरज संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त केली आहे़च्अकाली पाऊस, नापिकी आणि कर्जापोटी दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी घडली. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील गजानन देवराव खंडारे (३२) व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगावच्या शंकर श्रीराम शेंडे (३०) या दोन तरुण शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. च्गजानन खंडारे या अल्पभूधारक शेतकऱ्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने तो आॅटोरिक्शा चालवित असे. मात्र त्यातून पुरेसे पैसे मिळत नसल्याने तो निराश होता. याच निराशेतून त्याने हा आत्मघातकी निर्णय घेतला. तसे त्याने मृत्यूपूर्व लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतही नमूद केले होते. दुसऱ्या घटनेत ब्रह्मुपुरी तालुक्यातील तोरगाव (खु) येथील शंकर शेंडे या शेतकऱ्याने वनविभागाच्या नर्सरीत गळफास लावून घेतला. शेंडे यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्यावर बँकेचे ३८ हजारांचे कर्ज होते. च्जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदा अवकाळी पावसाचे निमित्त शोधून टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामांना फाटा दिला. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामांचाही सदोष आराखडा केला.च्आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा व जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा असे पाणीटंचाई निवारण्याचे नियोजन ठरलेले आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच पाणीटंचाई कृती आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. तथापि, आजवर हा आराखडा कधीच वेळेत सादर झालेला नाही.