शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रेशीम उद्योगातून शेतक-यांची अर्थक्रांती!, एकरातून लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:29 IST

काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या रेशीम उद्योगाला सातारा जिल्ह्यात चांगले दिवस येत असून, शेकडो शेतकरी याकडे आता वळू लागले आहे.

नितीन काळेलसातारा : काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या रेशीम उद्योगाला सातारा जिल्ह्यात चांगले दिवस येत असून, शेकडो शेतकरी याकडे आता वळू लागले आहे. अवघ्या एक एकर क्षेत्रामधून लाखो रुपयांचे उत्पन्न व शासनाकडून स्वत:च्या शेतात राबून रोजगाराच्या रुपातून पैसे मिळत असल्याने शेतकºयांच्या जीवनात ख-या अर्थाने अर्थक्रांती होऊ लागली आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यात ७०० एकरांवर तुतीची लागवड गेली आहे. दुष्काळी माण, फलटण तालुक्यांतही वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात अलीकडील काळात तुतीची लागवड वाढली आहे. कारण, जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, वातावरण, शेतक-यांचे जीवनमान आदी बाबी या रेशीम उद्योगासाठी पोषक ठरू लागल्या आहेत. त्यातच वाई येथे असणारे जिल्हा रेशीम कार्यालय त्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागले आहे. या कार्यालयांतर्गत रेशीम विस्तार, रिलींग फार्म व विस्तार विकासाचे कामकाज होते. त्यामुळेच रेशीम उद्योगाला चढती कमान प्राप्त आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम संचालनालयाने नवीन तुती लागवडीसाठी अभियान राबविले. त्याला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळेच जिल्ह्यात चालूवर्षी ४५० एकर क्षेत्रावर नवीन तुती लागवड होत आहे.

सध्या जुनी तुती लागवड क्षेत्र सातारा आणि क-हाड तालुक्यांत सर्वाधिक आहे. या तालुक्यातील शेतकरी चांगल्या प्रकारे रेशीम उद्योग करून उत्पादन घेत आहेत. सध्या जिल्ह्यात जुनी तुती लागवड असणारी शेतकरी संख्या ३०५ असून त्यांनी ३१४ एकरांवर लागवड केली आहे. तर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ४१५ शेतक-यांनी ३९६ एकरांवर नवीन तुती लागवड केली असून, ‘मनरेगा’ व्यतिरिक्त २८ शेतकºयांनी २८.५० असे एकूण ४४३ शेतकºयांनी ४२४.५० एकरांवर लागवड केली आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत शेतक-यांना दर आठवड्याला मजुरी अनुदान रक्कमही मिळत आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात तुती लागवड अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेंगतर्गत सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात तुती लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.

सध्या जिल्ह्यात जुनी तुती लागवड ३१४ एकरांवर असून, ३०५ शेतकरी सहभागी आहेत. नवीन तुती लागवडीत ४४३ शेतकºयांचा समावेश असून ४२४ एकरांवर लागवड आहे तर एकूण ७४८ शेतक-यांची ७३८ एकर क्षेत्रावर लागवड आहे. पूर्वी काही भागातच ही लागवड अधिक होत होती.आता मात्र, तसे राहिलेले नाही. माण, फलटणसारख्या दुष्काळी भागातही तुतीची लागवड वाढलेली आहे.

माणमध्ये नवीन तुती लागवड केलेले शेतकरी संख्या ७५ असून, सातारा आणि कोरेगाव तालुक्यानंतर माणचा तिसरा क्रमांक लागत आहे. २०१८-१९ साठीही माणमधील सर्वाधिक म्हणजे १७६ शेतकरी असून माध्यमातून तुतीची लागवड होत आहे. फलटण तालुक्यातही तुती लागवड करणाºयांची संख्या वाढत आहे.राज्य शासनाने तुती लागवडीच्या कामाचा समावेश ‘मनरेगा’त केला आहे. गट शेती कार्यक्रमांतर्गत एका शेतकºयाला एका एकरावरच तुतीची लागवड करता येणार असून, तीन वर्षांत ६८२ दिवसांची मजुरी मिळत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादकांना स्वत:च्याच शेतात मजुरी मिळत असल्याने हाही फायदा होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी