शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रेशीम उद्योगातून शेतक-यांची अर्थक्रांती!, एकरातून लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:29 IST

काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या रेशीम उद्योगाला सातारा जिल्ह्यात चांगले दिवस येत असून, शेकडो शेतकरी याकडे आता वळू लागले आहे.

नितीन काळेलसातारा : काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या रेशीम उद्योगाला सातारा जिल्ह्यात चांगले दिवस येत असून, शेकडो शेतकरी याकडे आता वळू लागले आहे. अवघ्या एक एकर क्षेत्रामधून लाखो रुपयांचे उत्पन्न व शासनाकडून स्वत:च्या शेतात राबून रोजगाराच्या रुपातून पैसे मिळत असल्याने शेतकºयांच्या जीवनात ख-या अर्थाने अर्थक्रांती होऊ लागली आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यात ७०० एकरांवर तुतीची लागवड गेली आहे. दुष्काळी माण, फलटण तालुक्यांतही वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात अलीकडील काळात तुतीची लागवड वाढली आहे. कारण, जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, वातावरण, शेतक-यांचे जीवनमान आदी बाबी या रेशीम उद्योगासाठी पोषक ठरू लागल्या आहेत. त्यातच वाई येथे असणारे जिल्हा रेशीम कार्यालय त्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागले आहे. या कार्यालयांतर्गत रेशीम विस्तार, रिलींग फार्म व विस्तार विकासाचे कामकाज होते. त्यामुळेच रेशीम उद्योगाला चढती कमान प्राप्त आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम संचालनालयाने नवीन तुती लागवडीसाठी अभियान राबविले. त्याला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळेच जिल्ह्यात चालूवर्षी ४५० एकर क्षेत्रावर नवीन तुती लागवड होत आहे.

सध्या जुनी तुती लागवड क्षेत्र सातारा आणि क-हाड तालुक्यांत सर्वाधिक आहे. या तालुक्यातील शेतकरी चांगल्या प्रकारे रेशीम उद्योग करून उत्पादन घेत आहेत. सध्या जिल्ह्यात जुनी तुती लागवड असणारी शेतकरी संख्या ३०५ असून त्यांनी ३१४ एकरांवर लागवड केली आहे. तर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ४१५ शेतक-यांनी ३९६ एकरांवर नवीन तुती लागवड केली असून, ‘मनरेगा’ व्यतिरिक्त २८ शेतकºयांनी २८.५० असे एकूण ४४३ शेतकºयांनी ४२४.५० एकरांवर लागवड केली आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत शेतक-यांना दर आठवड्याला मजुरी अनुदान रक्कमही मिळत आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात तुती लागवड अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेंगतर्गत सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात तुती लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.

सध्या जिल्ह्यात जुनी तुती लागवड ३१४ एकरांवर असून, ३०५ शेतकरी सहभागी आहेत. नवीन तुती लागवडीत ४४३ शेतकºयांचा समावेश असून ४२४ एकरांवर लागवड आहे तर एकूण ७४८ शेतक-यांची ७३८ एकर क्षेत्रावर लागवड आहे. पूर्वी काही भागातच ही लागवड अधिक होत होती.आता मात्र, तसे राहिलेले नाही. माण, फलटणसारख्या दुष्काळी भागातही तुतीची लागवड वाढलेली आहे.

माणमध्ये नवीन तुती लागवड केलेले शेतकरी संख्या ७५ असून, सातारा आणि कोरेगाव तालुक्यानंतर माणचा तिसरा क्रमांक लागत आहे. २०१८-१९ साठीही माणमधील सर्वाधिक म्हणजे १७६ शेतकरी असून माध्यमातून तुतीची लागवड होत आहे. फलटण तालुक्यातही तुती लागवड करणाºयांची संख्या वाढत आहे.राज्य शासनाने तुती लागवडीच्या कामाचा समावेश ‘मनरेगा’त केला आहे. गट शेती कार्यक्रमांतर्गत एका शेतकºयाला एका एकरावरच तुतीची लागवड करता येणार असून, तीन वर्षांत ६८२ दिवसांची मजुरी मिळत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादकांना स्वत:च्याच शेतात मजुरी मिळत असल्याने हाही फायदा होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी