शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफी, तुरीवरून राजकारण पेटले

By admin | Updated: May 3, 2017 04:33 IST

तुरीचा राजकीय भडका उडणे आता सुरू झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई : तुरीचा राजकीय भडका उडणे आता सुरू झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवनावर भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली. तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य द्वारासमोर कांदा अन् तूर फेकून आंदोलन केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. म्हणून कर्जमाफीची घोषणा करण्याकरता विधिमंडळाचे अधिवेशन तत्काळ घेण्याचे निर्देश राज्य शासनाला  द्या, असे साकडे विरोधकांनी  राज्यपालांना घातले. कृषी पंपांचे वीजबिल  माफ करण्याची मागणीही त्यांनी केली. तूरीच्या खरेदीतील गैरव्यवहारांकडे त्यांनी लक्ष वेधले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे  आ. जयंत पाटील, संयुक्त जनता  दलाचे आ.कपिल पाटील, पीरिपाचे  आ. जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे आ.भाई जगताप आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अचानक मंत्रालयाच्या मुख्य द्वारासमोर कांदा, तूर, फळे फेकून आंदोलन केले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर व्यक्तिगत जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा, कांद्याच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, तूरडाळीच्या खरेदीत पणन, कृषी, नाफेडचे अधिकारी आणि संपूर्ण प्रक्रियेची सीआयडी चौकशी करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी केले. पंजाबराव पाटील, बी.जी.पाटील, भीमाशंकर बिराजदार, नितीन पाटील, माऊली हळणकर प्रामुख्याने सहभागी झाले. तूर खरेदी पाच दिवसांत पूर्ण करा : मुख्यमंत्रीशासनाच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी आणलेली तूर येत्या पाच ते सहा दिवसांत खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. या तूरखरेदीसाठी अतिरिक्त यंत्रणा राबवा आणि दोन पाळ्यांमध्ये काम करा, असे निर्देर्श त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. अमरावती विभागात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याचे लक्षात घेऊन खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. धारणीमध्ये अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आले असून आता एकूण ११ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर दहा वजनकाटे ठेवण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात ग्रेडर उपलब्ध व्हावेत म्हणून कृषी विभागातील पर्यवेक्षक तसेच सहाय्यक निबंधक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरीचे जलद ग्रेडेशन करून खरेदी प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बारदाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे तसेच साठवणुकीसाठी खाजगी गोदामांचे अधिग्रहण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शिवसेनाही सरसावली : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली असताना आज शिवसेनेनेही तीच मागणी केली. त्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. जीएसटी अधिवेशन २० ते २२ मेपर्यंतजीएसटीसाठी राज्याचा कायदा करण्याकरता विधिमंडळाचे अधिवेशन आता २० ते २२ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या तारखा निश्चित केल्या. दोन दिवसांपूर्वी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन २१ ते २३ मे दरम्यान घेण्याची शिफारस करण्यात आली होती.