शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

शेतकरी आत्महत्यांवरून गदारोळ

By admin | Updated: March 15, 2016 01:46 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा अहवाल मिळाला नसल्याचे कारण देत, सरकारने पन्नास टक्के आत्महत्याग्रस्तांना मदत नाकारल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर गेल्या दहा वर्षांतील तुमची पापे आम्ही फेडतोय. तुमच्या चुकीच्या धोरणांची फळे शेतकऱ्यांना भोगावी लागत असल्याचा पलटवार खडसे यांनी केला. या गदारोळात विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकुब करावे लागले. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. तब्बल ४५ सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘राज्यात गेल्या वर्षभरात ३ हजार ३२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी १८४१ आत्महत्या शेती संकटामुळे झाली असल्याने, कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणात व्हिसेरा अहवाल मिळाला नसल्याने, सदर प्रकरणे फेरतपासणीसाठी पाठविण्यात आली,’ असे खडसे यांनी सांगितले. खडसे यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूकेली. आत्महत्याग्रस्तांना मदत करण्यासाठी व्हिसेराचा अहवाल लागतोच कशाला, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. व्हिसेरा अहवालाचे कारण देत मदत नाकारणे ही दिशाभूल असल्याचा आरोप करत, विरोधक सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. या घोषणाबाजीनंतर खडसे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तुम्ही केलेली पापे आम्ही फेडतोय, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. (प्रतिनिधी) आत्महत्येच्या प्रश्नावर ११ उपप्रश्नतारांकित प्रश्नाला किती उपप्रश्न असावे, याबाबत काही नियम संकेत आहेत. मात्र, आत्महत्येच्या या प्रश्नावर तब्बल ११ उपप्रश्न विचारण्यात आले. विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी, असे सांगत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. यावर सभागृहातील तब्बल ४५ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने, त्यांचे समाधान होणे महत्त्वाचे असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.