शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांवरून गदारोळ

By admin | Updated: March 15, 2016 01:46 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा अहवाल मिळाला नसल्याचे कारण देत, सरकारने पन्नास टक्के आत्महत्याग्रस्तांना मदत नाकारल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर गेल्या दहा वर्षांतील तुमची पापे आम्ही फेडतोय. तुमच्या चुकीच्या धोरणांची फळे शेतकऱ्यांना भोगावी लागत असल्याचा पलटवार खडसे यांनी केला. या गदारोळात विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकुब करावे लागले. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. तब्बल ४५ सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘राज्यात गेल्या वर्षभरात ३ हजार ३२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी १८४१ आत्महत्या शेती संकटामुळे झाली असल्याने, कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणात व्हिसेरा अहवाल मिळाला नसल्याने, सदर प्रकरणे फेरतपासणीसाठी पाठविण्यात आली,’ असे खडसे यांनी सांगितले. खडसे यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूकेली. आत्महत्याग्रस्तांना मदत करण्यासाठी व्हिसेराचा अहवाल लागतोच कशाला, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. व्हिसेरा अहवालाचे कारण देत मदत नाकारणे ही दिशाभूल असल्याचा आरोप करत, विरोधक सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. या घोषणाबाजीनंतर खडसे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तुम्ही केलेली पापे आम्ही फेडतोय, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. (प्रतिनिधी) आत्महत्येच्या प्रश्नावर ११ उपप्रश्नतारांकित प्रश्नाला किती उपप्रश्न असावे, याबाबत काही नियम संकेत आहेत. मात्र, आत्महत्येच्या या प्रश्नावर तब्बल ११ उपप्रश्न विचारण्यात आले. विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी, असे सांगत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. यावर सभागृहातील तब्बल ४५ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने, त्यांचे समाधान होणे महत्त्वाचे असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.