शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

स्वत:चे सरण रचून शेतक-याने जाळून घेतले

By admin | Updated: June 13, 2016 08:37 IST

कर्जबाजारी शेतक-याने स्वत:चे सरण रचून जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली.

ळगाव, दि. १३ - कर्जबाजारी शेतक-याने स्वत:चे सरण रचून जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सबगव्हाण येथे उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणास कंटाळून या शेतकर्‍याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.शनिवारी रात्री ९.३0 वाजेच्या सुमारास नामदेव मरा पाटील (७0 ,रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी स्मशानभूमीत सरण रचून त्यावर जाळून घेतले. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीजवळ अमृताबाई नामदेव पाटील यांच्या शेतात आग लागल्याची माहिती गावात कळाली. त्यानंतर गावातील काही लोक व पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सरणावर एक वृद्ध जळत असल्याचे आढळून आले. पोलीस घटनास्थळी आल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस पाटलांनी जळालेल्या व्यक्तीला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, शिवाय या व्यक्तीची ओळखली पटली नव्हती.रविवारी सकाळी मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले. सरण तारांनी बांधलेले त्यांना आढळून आले. अधिक चौकशी केल्यानंतर शेतमालक नामदेव पाटील हे शनिवारी मुंदाणे येथे मुलीकडे गेल्याचे सांगण्यात आले. मात्र ते मुंदाणे येथे पोहचलेच नव्हते. शेतातील झोपडीवजा घरात त्यांचे आधारकार्ड, पैसे व रॉकेलचा डबाही पडलेला होता. त्यावरून त्यांनीच आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पाटील यांच्यावर सोसायटीचे ३५ हजार रूपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे. पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)