शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

शेतक-यांनी पेटवली कांदा आणि कापसाची होळी!

By admin | Updated: March 24, 2016 02:05 IST

कांद्याचे भाव गडगडल्यामुळे व्यथीत शेतक-यांनी कांद्याची तर कापूस उत्पादक शेतक-यांनी कापसाची होळी पेटवली.

संग्रामपूर/खामगाव (जि. बुलडाणा) : कांद्याचे भाव गडगडल्यामुळे व्यथीत झालेल्या संग्रामपूरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याची तर दुष्काळी मदतीमधून कापूस उत्पादकांना वगळल्याच्या निषेधार्थ खामगाव तालुक्यात कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी कापसाची होळी पेटवली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी सरकारच्या नावाने बोंबही ठोकली. कांदो व्यापार्‍याकडून सद्या प्रति क्विंटल ३५0 ते ४00 रुपये दर दिला जात असून शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. कांदा उत्पादकाच्या व्यथेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विजय वानखडे, नारायण तायडे, लक्ष्मण घाटे, जनार्दन म्हसाळ, सुनील वानखडे, बाबुराव वानखडे, स्वाती तायडे, सुरज तायडे, रामदास तायडे, गणेश कुले आदी शेतकर्‍यांनी कांद्याची होळी करुन एकमेकांना रंग न लावता कांदे मारुन होळी साजरी केली . खामगाव तालुक्यातील पारखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्त्वात कापसाची होळी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी दुष्काळत होरपळत आहे. कापूस उत्पादकांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने दुष्काळी मदतीतून कापूस उत्पादकांना वगळले आहे. शासनाच्या या धोरणाच निषेध करण्यासाठी शेतकर्‍यांनी कापसाची होळी पेटवली. यावेळी विदर्भातील कापूस उत्पादकांना दुष्काळी मदत द्यावी, कापसाला भाववाढ देण्यात यावी, अशी मागणी करत शासनाच्या धोरणाविरोधात नारे व बोंब ठोकण्यात आली.