शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

शेतक-यांनी पेटवली कांदा आणि कापसाची होळी!

By admin | Updated: March 24, 2016 02:05 IST

कांद्याचे भाव गडगडल्यामुळे व्यथीत शेतक-यांनी कांद्याची तर कापूस उत्पादक शेतक-यांनी कापसाची होळी पेटवली.

संग्रामपूर/खामगाव (जि. बुलडाणा) : कांद्याचे भाव गडगडल्यामुळे व्यथीत झालेल्या संग्रामपूरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याची तर दुष्काळी मदतीमधून कापूस उत्पादकांना वगळल्याच्या निषेधार्थ खामगाव तालुक्यात कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी कापसाची होळी पेटवली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी सरकारच्या नावाने बोंबही ठोकली. कांदो व्यापार्‍याकडून सद्या प्रति क्विंटल ३५0 ते ४00 रुपये दर दिला जात असून शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. कांदा उत्पादकाच्या व्यथेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विजय वानखडे, नारायण तायडे, लक्ष्मण घाटे, जनार्दन म्हसाळ, सुनील वानखडे, बाबुराव वानखडे, स्वाती तायडे, सुरज तायडे, रामदास तायडे, गणेश कुले आदी शेतकर्‍यांनी कांद्याची होळी करुन एकमेकांना रंग न लावता कांदे मारुन होळी साजरी केली . खामगाव तालुक्यातील पारखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्त्वात कापसाची होळी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी दुष्काळत होरपळत आहे. कापूस उत्पादकांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने दुष्काळी मदतीतून कापूस उत्पादकांना वगळले आहे. शासनाच्या या धोरणाच निषेध करण्यासाठी शेतकर्‍यांनी कापसाची होळी पेटवली. यावेळी विदर्भातील कापूस उत्पादकांना दुष्काळी मदत द्यावी, कापसाला भाववाढ देण्यात यावी, अशी मागणी करत शासनाच्या धोरणाविरोधात नारे व बोंब ठोकण्यात आली.