शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

शेतातून ताटापर्यंत: शेतकरी हे कोविड-19मधील खरे नायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:08 IST

इतिहासातील हे पहिलेच मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकट होते ज्यामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला नाही आणि पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही.

मुंबई: कोविडचा सामना करणारे डॉक्टर, नर्स व सिव्हिक कामगार यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आपण आणि अवघे जग टाळ्या वाजवत होते आणि थाळ्या व भांडी वाजवत होते तेव्हा अशा काही व्यक्ती दिवसरात्र काम करत होत्या, आपल्याला अन्न पुरवता यावे म्हणून कष्ट करत होत्या, त्या व्यक्ती म्हणजे आपले शेतकरी. त्यांच्यासाठी जणू लॉकडाउन नव्हताच.

इतिहासातील हे पहिलेच मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकट होते ज्यामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला नाही आणि पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही. कोविड-19चे संक्रमण झपाट्याने होऊ लागल्यावर, फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येकाचे आयुष्य खडतर झाले आहे. ही अपूर्व स्वरूपाची परिस्थिती आहे आणि आपल्याला भीतीने ग्रासले आहे.

चांगला काळ, वाईट काळदीर्घ काळ चाललेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये, आपण कुटुंबासोबत चांगला वेळ घालवून, निरनिराळे पदार्थ खाऊन जीवनाचा काही आनंद खऱ्या अर्थाने अनुभवला. आपल्यापैकी काही जणांनी स्वयंपाकाचा आनंद घेतला आणि ते यशस्वी होम शेफ बनले.

काहींना नोकऱ्या गमावलेल्या आणि तातडीने मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्न बनवले. परंतु, अन्य आपत्तींच्या वेळी होते तसे या आपत्तीमध्ये अन्नाचा तुटवडा कधीही निर्माण झाला नाही. आपल्या शेतकऱ्यांनी सर्व अडथळ्यांचा सामना करत आपले काम सुरूच ठेवले, घराघरात वेळेवर अन्न मिळावे म्हणून त्यांनी जास्तीचे कामही केले.

अडचणींची शर्यतशेतकऱ्यांसाठी फेब्रुवारीचा मध्य ते जुलैचा मध्य हा कालावधी अतिशय व्यग्रतेचा असतो. या कालावधीमध्ये कांदे, बटाटे, गहू, ऊस, मोहरी अशी महत्त्वाची पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळे अशी फळे तयार होतात. त्यांना पुढच्या हंगामासाठी (खरिप) जमिनीची मशागतही करायची असते. त्यामुळे त्यांना प्रचंड काम असते. 

सर्वसाधारण परिस्थितीतही शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना व अनिश्चिततेला तोंड द्यावे लागते, जसे अपुरा व विलंबाने येणारा मान्सून, सावकारांची पिळवणूक, पिकाला योग्य दर न मिळणे. लॉकडाउनमुळे मंडई, पुरवठा साखळी व्यवस्था याकडून मागणी विस्कळीत झाला, तसेच कामगारांचा तुटवडा निर्माण झाला.

त्यांचा यथार्थ गौरव करू - #थँकयूफार्मर्स - असे असतानाही, आपल्या शेतकऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला निरोगी व सक्षम ठेवण्याची जबाबदारी उचलली आणि आपल्याला ताजी फळे, भाज्य व धान्य पुरवले. त्यांना न थांबता काम केले, त्यामुळे आपण लॉकडाउनच्या काळात घरी सुरक्षित राहू शकलो आणि आपल्या मुलांची व वयस्कर व्यक्तींची काळजी घेऊ शकलो.

परंतु, या नायकांच्या योगदानाची दखल घेतली गेली का आणि त्यांचे कौतुक केले गेले का? यानिमित्ताने, लॉकडाउनच्या काळात आपल्याला अन्नाची चणचण भासू न देणाऱ्या, तसेच देशाला खऱ्या अर्थी चालना देणाऱ्या या भूमिपुत्रांना आदराने सलाम करूया.

सह्याद्री फार्म्स या एका सर्वात मोठ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने शहरी व ग्रामीण भागाला एकमेकाशी जोडण्यासाठी 'थँक यू फार्मर्स' हे अभियान सुरू केले आहे. ग्रामीण भागांनी शहरी भागांना आणि शहरी भागांनी ग्रामीण भागांना समजून घ्यायला हवे, याविषयी जागृती करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या पुढील सोशल मीडिया पेजेसवर फिल्म पाहाता येईल – यूट्युब, इन्स्टाग्राम व फेसबुक.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या