शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

खरेदीदारांकडून शेतकरी वेठीला

By admin | Updated: July 18, 2016 01:19 IST

शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पुणे : शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. खरेदी बंदमुळे मार्केट यार्डात शेतीमाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिला. परिणामी, शेतकऱ्यांना कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी चक्क एक रुपयाने दराने विकावी लागली. कष्टाने पिकविलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी निराश झाले. खरेदीदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे वेठीला धरल्या गेलेल्या काही शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देऊन घरी परतावे लागले.मार्केट यार्डात रविवारी सुमारे २२५ ट्रक मालाची आवक झाली. मात्र, ऐन खरेदीच्या वेळी खरेदीदारांनी सामूहिकरीत्या माल खरेदी करण्यास नकार दिल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. बाजार समिती प्रशासन आणि अडत्यांनी प्रयत्न करूनही खरेदीदार शेतीमाल खरेदीसाठी तयार झाले नाहीत. परिणामी, रविवारी बाजार ठप्प झाल्याचे दिसून आले. बाजारात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण केले. परंतु, गोंधळामुळे बराच उशीर झाल्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. खरेदीदारांचा बहिष्कार आणि पावसाची हजेरी यामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वसाधारणपणे ८ ते १० रुपयांना विकली जाणारी पालेभाज्यांची गड्डी रविवारी एक ते दोन रुपये दराने विकली गेली. शेतकऱ्यांचे गाडीचे भाडेही सुटले नाही. काही शेतकऱ्यांनी कंटाळून जाग्यावरच माल सोडून दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘खरेदीदारांकडून बंद पुकारला जाणार असल्याचे रात्री उशिरा समजल्यानंतर काही खरेदीदारांबरोबर चर्चा केली होती. खरेदीदारांची कोणती संघटना नसल्यामुळे अचानक पुकारलेल्या बंदला सामोरे जावे लागले. खरेदी बंद झाल्याने माल शिल्लक राहिला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही आढावा घेऊन शिल्लक राहिलेला माल शहरात विकण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. काही शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात सोडून जावा लागला. हे खरे असले तरी अशा शेतकऱ्यांची संख्या थोडी आहे. यापुढे खरेदीदारांनी बंद पुकारल्यास पर्यायी व्यवस्थेचा विचार सुरू आहे. अधिकाऱ्यांशी बोलून आठवडे बाजाराच्या आरक्षित जागांवर शेतीमाल विक्री केली जाणार आहे.>शेतीमालाचे दर घसरलेबाजार समिती प्रशासनाने बैठक घेऊन खरेदीदार व शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेतली. मात्र, या सर्व गोंधळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मागणीअभावी काही फळभाज्यांचे दर निम्म्याने, तर काहींचे दर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले. त्यामुळे बाजारात माल शिल्लक राहिला.