शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
7
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
8
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
9
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
10
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
11
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
12
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
13
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
14
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
15
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
16
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
17
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
18
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
19
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीदारांकडून शेतकरी वेठीला

By admin | Updated: July 18, 2016 01:19 IST

शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पुणे : शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. खरेदी बंदमुळे मार्केट यार्डात शेतीमाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिला. परिणामी, शेतकऱ्यांना कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी चक्क एक रुपयाने दराने विकावी लागली. कष्टाने पिकविलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी निराश झाले. खरेदीदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे वेठीला धरल्या गेलेल्या काही शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देऊन घरी परतावे लागले.मार्केट यार्डात रविवारी सुमारे २२५ ट्रक मालाची आवक झाली. मात्र, ऐन खरेदीच्या वेळी खरेदीदारांनी सामूहिकरीत्या माल खरेदी करण्यास नकार दिल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. बाजार समिती प्रशासन आणि अडत्यांनी प्रयत्न करूनही खरेदीदार शेतीमाल खरेदीसाठी तयार झाले नाहीत. परिणामी, रविवारी बाजार ठप्प झाल्याचे दिसून आले. बाजारात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण केले. परंतु, गोंधळामुळे बराच उशीर झाल्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. खरेदीदारांचा बहिष्कार आणि पावसाची हजेरी यामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वसाधारणपणे ८ ते १० रुपयांना विकली जाणारी पालेभाज्यांची गड्डी रविवारी एक ते दोन रुपये दराने विकली गेली. शेतकऱ्यांचे गाडीचे भाडेही सुटले नाही. काही शेतकऱ्यांनी कंटाळून जाग्यावरच माल सोडून दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘खरेदीदारांकडून बंद पुकारला जाणार असल्याचे रात्री उशिरा समजल्यानंतर काही खरेदीदारांबरोबर चर्चा केली होती. खरेदीदारांची कोणती संघटना नसल्यामुळे अचानक पुकारलेल्या बंदला सामोरे जावे लागले. खरेदी बंद झाल्याने माल शिल्लक राहिला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही आढावा घेऊन शिल्लक राहिलेला माल शहरात विकण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. काही शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात सोडून जावा लागला. हे खरे असले तरी अशा शेतकऱ्यांची संख्या थोडी आहे. यापुढे खरेदीदारांनी बंद पुकारल्यास पर्यायी व्यवस्थेचा विचार सुरू आहे. अधिकाऱ्यांशी बोलून आठवडे बाजाराच्या आरक्षित जागांवर शेतीमाल विक्री केली जाणार आहे.>शेतीमालाचे दर घसरलेबाजार समिती प्रशासनाने बैठक घेऊन खरेदीदार व शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेतली. मात्र, या सर्व गोंधळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मागणीअभावी काही फळभाज्यांचे दर निम्म्याने, तर काहींचे दर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले. त्यामुळे बाजारात माल शिल्लक राहिला.