शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज फेडून शेतक-याने घेतला गळफास!

By admin | Updated: March 13, 2016 02:30 IST

पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची संपवली यात्रा.

बोरगाव मंजू (अकोला): गत काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस, सततची नापिकी यामुळे हतबल झालेल्या कट्यार येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. एरव्ही, कर्जाचे ओझे असह्य़ झाल्यामुळे शेतकर्‍यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना उघडकीस येतात. या शेतकर्‍याने मात्र पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची यात्रा संपवली. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्यार येथील सुरेश किसन खराटे (४८) यांच्याकडे आठ एकर शेती असून, यावेळी त्यांच्या पिकांनाही अत्यल्प पावसाचा फटका सोसावा लागला. त्यामुळे सोयाबीन व तूर पीक हातचे गेले. लावलेला खर्चही न निघाल्याने ते चिंतेत होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, बाळू खराटे यांनी माहिती दिल्यानंतर, बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर, पोलीस उपनिरीक्षक उईके, हेडकॉन्स्टेबल अरुण गावंडे, जनार्दन चंदन, हरीश सातव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. १२ फेब्रुवारीला केला होता कर्जाचा भरणानापीकीमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही सुरेश खराटे यांनी त्यांच्या डोक्यावर असलेले सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज फेडले होते. खराटे यांनी पिककर्ज म्हणून घेतलेली १ लाख १७ हजार ९२५ रुपयांची रक्कम १२ फेब्रुवारी रोजी सोसायटीत जमा केली. याबाबतचा ह्यनिलह्णचा दाखलाही त्यांना देण्यात आला आहे.