शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामावर शेतक-यांचा बहिष्कार!

By admin | Updated: March 8, 2016 02:23 IST

आर्थिक परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील जामदरी गावातील शेतक-यांनी घेतली टोकाची भूमिका, मोलमजुरी करून उपजिविका भागविणार.

विवेक चांदूरकर/ वाशिम गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेला दुष्काळ, थकीत कर्जामुळे बँकांचे बंद झालेले दरवाजे आणि पेरणीसाठीही पैसे नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी खरिप हंगामावर बहिष्कार टाकण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. वाशिम जिल्ह्यातील जामदरा गावात हा प्रकार समोर आला आहे.वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील जामदरा गाव गत तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळले जात आहे. दरवर्षी शेतात लाखो रूपये लाऊन निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहत आहे. परिणामी, शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्पादन खर्चाच्या ५0 टक्केही उत्पन्न होत नाही. शेतकर्‍यांनी पदरचे पैसे शेतीत लावले, त्यानंतर बँकांकडून कर्ज घेतले, मात्र अल्प उत्पन्नामुळे कर्ज थकले. अशातच सावकारांनीही दरवाजे बंद केल्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसेच राहिले नाहीत. त्यामुळे आणखी कर्ज काढून, पुन्हा नुकसानाचा सामना करण्यापेक्षा यावर्षी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यासाठी गावकर्‍यांच्यावतीने गावात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण गावातील नागरिक उपस्थित होते. यावर्षीच्या हंगामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावर्षी पेरणीच करायची नाही, त्याऐवजी मोलमजूरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा, असे यावेळी गावकर्‍यांनी सर्वानुमते ठरविले. पीक घेण्यासाठी पैसे आणि श्रमही लागतात. त्याऐवजी मोलमजुरी केली, तर हमखास पैसे मिळतात. मजुरीचे दर वाढले असल्यामुळे त्या माध्यमातून कुटुंबाचे पालनपोषण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा पर्याय गावकर्‍यांनी निवडला. याबाबतचे निवेदन त्यांनी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना दिले आहे.ना मागणी, ना तक्रार, ना रोष गावकर्‍यांनी खरीप हंगामावर बहिष्कार टाकताना शासनाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. कुणाप्रती रोष व्यक्त केला नाही, किंवा कुणाची तक्रारही केली नाही. जमीन पडिक ठेऊन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

बँकांचे दरवाजे बंद घरातील भागभांडवल संपल्यामुळे शेतकर्‍यांनी बँकांकडून कर्ज घेतले. बँकांचे कर्ज थकल्यानंतर गतवर्षी पुनर्गठन करून नवीन कर्ज घेण्यात आले; मात्र शेतीचे उत्पन्न २५ टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे ते कर्ज भरण्यासाठीही शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत. कर्जाचा डोंगर मात्र कायम आहे. शासनाच्या कडक धोरणामुळे सावकरांनी कर्ज देणे बंद केले आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे सोनेही नाही. एकूणच सर्व बाजुंनी आर्थिक कोंडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.