शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

खरीप हंगामावर शेतक-यांचा बहिष्कार!

By admin | Updated: March 8, 2016 02:23 IST

आर्थिक परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील जामदरी गावातील शेतक-यांनी घेतली टोकाची भूमिका, मोलमजुरी करून उपजिविका भागविणार.

विवेक चांदूरकर/ वाशिम गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेला दुष्काळ, थकीत कर्जामुळे बँकांचे बंद झालेले दरवाजे आणि पेरणीसाठीही पैसे नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी खरिप हंगामावर बहिष्कार टाकण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. वाशिम जिल्ह्यातील जामदरा गावात हा प्रकार समोर आला आहे.वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील जामदरा गाव गत तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळले जात आहे. दरवर्षी शेतात लाखो रूपये लाऊन निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहत आहे. परिणामी, शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्पादन खर्चाच्या ५0 टक्केही उत्पन्न होत नाही. शेतकर्‍यांनी पदरचे पैसे शेतीत लावले, त्यानंतर बँकांकडून कर्ज घेतले, मात्र अल्प उत्पन्नामुळे कर्ज थकले. अशातच सावकारांनीही दरवाजे बंद केल्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसेच राहिले नाहीत. त्यामुळे आणखी कर्ज काढून, पुन्हा नुकसानाचा सामना करण्यापेक्षा यावर्षी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यासाठी गावकर्‍यांच्यावतीने गावात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण गावातील नागरिक उपस्थित होते. यावर्षीच्या हंगामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावर्षी पेरणीच करायची नाही, त्याऐवजी मोलमजूरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा, असे यावेळी गावकर्‍यांनी सर्वानुमते ठरविले. पीक घेण्यासाठी पैसे आणि श्रमही लागतात. त्याऐवजी मोलमजुरी केली, तर हमखास पैसे मिळतात. मजुरीचे दर वाढले असल्यामुळे त्या माध्यमातून कुटुंबाचे पालनपोषण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा पर्याय गावकर्‍यांनी निवडला. याबाबतचे निवेदन त्यांनी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना दिले आहे.ना मागणी, ना तक्रार, ना रोष गावकर्‍यांनी खरीप हंगामावर बहिष्कार टाकताना शासनाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. कुणाप्रती रोष व्यक्त केला नाही, किंवा कुणाची तक्रारही केली नाही. जमीन पडिक ठेऊन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

बँकांचे दरवाजे बंद घरातील भागभांडवल संपल्यामुळे शेतकर्‍यांनी बँकांकडून कर्ज घेतले. बँकांचे कर्ज थकल्यानंतर गतवर्षी पुनर्गठन करून नवीन कर्ज घेण्यात आले; मात्र शेतीचे उत्पन्न २५ टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे ते कर्ज भरण्यासाठीही शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत. कर्जाचा डोंगर मात्र कायम आहे. शासनाच्या कडक धोरणामुळे सावकरांनी कर्ज देणे बंद केले आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे सोनेही नाही. एकूणच सर्व बाजुंनी आर्थिक कोंडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.