शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

घरावर वृक्ष कोसळल्यामुळे कुटुंब बेघर

By admin | Updated: August 4, 2016 02:08 IST

मुसळधार पावसामध्ये घरावर झाड कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे.

नवी मुंबई : मुसळधार पावसामध्ये घरावर झाड कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. या घटनेमध्ये वृध्द विधवा महिलेचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या घरालगतचे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे ते तोडण्याची प्रशासनाकडे मागणी करूनही दखल न घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप त्या कुटुंबीयांनी केला आहे.मागील तीन दिवसांपासून शहरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असून, अनेक विभागांमध्ये सोसाट्याचा वाराही वाहत आहे. रविवारी दुपारी अशाच मुसळधार पावसात घणसोली गावातील म्हशेश्वरनगरमधील एक झाड कोसळले. परंतु हे झाड लगतच्या काळुबाई पाटील यांच्या घरावर कोसळले. त्यांचे पती पांडुरंग व मोठा मुलगा मनोज यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात काळुबाई, लहान मुलगा ज्ञानेश्वर याच्यासोबत मासेमारी करून कसाबसा संसाराचा गाडा हाकत आहेत. त्याठिकाणी काळुबाई यांच्यासह त्यांचा मुलगा, दोन सुना व त्यांची लहान मुले यांचे वास्तव्य होते. परंतु निसर्गाने त्यांचा निवारा देखील हिसकावून घेतला आहे. मात्र या संपूर्ण घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या घरालगतचे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यापासून घराला धोका असल्याची कल्पना त्यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार हे झाड कापण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या विनंतीची कोणीच दखल घेतली नाही. अखेर रविवारी ते झाड त्यांच्या घरावर कोसळले. यामध्ये काळुबाई यांचे जुने घर जमीनदोस्त झाले. सुदैवाने पावसाचा जोर जास्त वाढल्यामुळे भीतीपोटी घटनेच्या काही वेळ अगोदरच सर्व जण शेजाऱ्यांकडे गेले होते. त्यामुळे या घटनेत अगदी थोडक्यात जीवितहानी टळली असली, तरीही संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे. माणुसकीच्या भावनेतून त्याच परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत यशवंत पाटील यांनी त्या कुटुंबाला तात्पुरता आधार दिलेला आहे. उघड्यावर आलेल्या या कुटुंबाच्या तूर्तास राहण्याची व जेवणाची सोय त्यांनी करून दिलेली आहे. परंतु त्यांचे घर उद्ध्वस्त होण्याला प्रशासन जबाबदार असल्यामुळे प्रशासनाकडूनच त्यांचे पुनर्वसन देखील होण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)