शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घरावर वृक्ष कोसळल्यामुळे कुटुंब बेघर

By admin | Updated: August 4, 2016 02:08 IST

मुसळधार पावसामध्ये घरावर झाड कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे.

नवी मुंबई : मुसळधार पावसामध्ये घरावर झाड कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. या घटनेमध्ये वृध्द विधवा महिलेचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या घरालगतचे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे ते तोडण्याची प्रशासनाकडे मागणी करूनही दखल न घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप त्या कुटुंबीयांनी केला आहे.मागील तीन दिवसांपासून शहरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असून, अनेक विभागांमध्ये सोसाट्याचा वाराही वाहत आहे. रविवारी दुपारी अशाच मुसळधार पावसात घणसोली गावातील म्हशेश्वरनगरमधील एक झाड कोसळले. परंतु हे झाड लगतच्या काळुबाई पाटील यांच्या घरावर कोसळले. त्यांचे पती पांडुरंग व मोठा मुलगा मनोज यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात काळुबाई, लहान मुलगा ज्ञानेश्वर याच्यासोबत मासेमारी करून कसाबसा संसाराचा गाडा हाकत आहेत. त्याठिकाणी काळुबाई यांच्यासह त्यांचा मुलगा, दोन सुना व त्यांची लहान मुले यांचे वास्तव्य होते. परंतु निसर्गाने त्यांचा निवारा देखील हिसकावून घेतला आहे. मात्र या संपूर्ण घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या घरालगतचे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यापासून घराला धोका असल्याची कल्पना त्यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार हे झाड कापण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या विनंतीची कोणीच दखल घेतली नाही. अखेर रविवारी ते झाड त्यांच्या घरावर कोसळले. यामध्ये काळुबाई यांचे जुने घर जमीनदोस्त झाले. सुदैवाने पावसाचा जोर जास्त वाढल्यामुळे भीतीपोटी घटनेच्या काही वेळ अगोदरच सर्व जण शेजाऱ्यांकडे गेले होते. त्यामुळे या घटनेत अगदी थोडक्यात जीवितहानी टळली असली, तरीही संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे. माणुसकीच्या भावनेतून त्याच परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत यशवंत पाटील यांनी त्या कुटुंबाला तात्पुरता आधार दिलेला आहे. उघड्यावर आलेल्या या कुटुंबाच्या तूर्तास राहण्याची व जेवणाची सोय त्यांनी करून दिलेली आहे. परंतु त्यांचे घर उद्ध्वस्त होण्याला प्रशासन जबाबदार असल्यामुळे प्रशासनाकडूनच त्यांचे पुनर्वसन देखील होण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)