शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: June 8, 2017 01:12 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअवसरी : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यासाठी लाखो रूपये खर्च होऊनही रस्त्याचा वापर नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करून दाखविल्या आहेत.पारगाव ते धामणी फाटा या रस्त्यावरील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी असा जवळपास ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासुन सुरू होते व ते सध्या पूर्ण होत आले आहे. मात्र हा रस्ता करत असताना काठापुर बुद्रुक गावच्या हद्दीतील गणेशवस्तीजवळ या रस्त्यावरून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची चारी गेली आहे. ही चारी रस्त्यावर पुल बांधुन गेली आहे. त्यामुळे चारीखालून जाणारा रस्ता खोल केला आहे. या ठिकाणी पावसाचे व कालव्याचे पाणी या चारीखालील रस्त्यावर साचते. हे पाणी तीन ते चार फुटांपर्यंत साचत असल्याने तेथुन वाहतुक करता येत नाही. अनेक वाहने या ठिकाणी बंद पडतात. त्यामुळे वाहतुक करणारे वाहनचालक हा रस्ता नवीन असुनही वापरत नाही. या ठिकाणी रस्त्याची उंची दोन्ही बाजुचा रस्ता ४ फूट उंच आहे. मात्र या पाण्याच्या चारी खाली तो चार फुट खोल आहे. कारण येथे रस्त्यांची उंची वाढवली तर वाहने पाटाच्या चारीच्या पुलाला अडकतात. त्यामुळे रस्त्याची उंची वाढवता येत नाही. ही चारी बांधुन ८ ते १० वर्ष उलटली आहे. परंतु या चारीला पाणी अजुनही आले नाही. कारण ही चारी रस्त्यावरती जितकी उंच आहे. त्यापेक्षा पुढे ती जास्त उंच आहे. त्यामुळे या चारीत जमिनी जावुनही येथील शेतकऱ्यांना अजुन पाणी मिळाले नाही. पाणी शेतीसाठी मिळाले नाही. मात्र हे पाणी रस्त्यावर साचते. व रस्ता बंद होतो.सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या चुकीच्या धोरणाचा फटका येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे. चारीची उंची कमी असल्याने काठापुर गावाला मागील दहा वर्षात चारीचे काम होऊनही पाणी मिळाले नाही. कारण पाणी पुढे जातच नाही. वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी पाटाच्या पाण्याचे प्रयत्न सोडून दिले आहे. पाणी तर येतच नाही. कारण या चारीची उंची कमी असल्याने या चारीखालुन असणारा रस्ता खोल केला गेला आहे.