शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: June 8, 2017 01:12 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअवसरी : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यासाठी लाखो रूपये खर्च होऊनही रस्त्याचा वापर नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करून दाखविल्या आहेत.पारगाव ते धामणी फाटा या रस्त्यावरील वैद्यवाडी फाटा ते पोंदेवाडी असा जवळपास ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासुन सुरू होते व ते सध्या पूर्ण होत आले आहे. मात्र हा रस्ता करत असताना काठापुर बुद्रुक गावच्या हद्दीतील गणेशवस्तीजवळ या रस्त्यावरून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची चारी गेली आहे. ही चारी रस्त्यावर पुल बांधुन गेली आहे. त्यामुळे चारीखालून जाणारा रस्ता खोल केला आहे. या ठिकाणी पावसाचे व कालव्याचे पाणी या चारीखालील रस्त्यावर साचते. हे पाणी तीन ते चार फुटांपर्यंत साचत असल्याने तेथुन वाहतुक करता येत नाही. अनेक वाहने या ठिकाणी बंद पडतात. त्यामुळे वाहतुक करणारे वाहनचालक हा रस्ता नवीन असुनही वापरत नाही. या ठिकाणी रस्त्याची उंची दोन्ही बाजुचा रस्ता ४ फूट उंच आहे. मात्र या पाण्याच्या चारी खाली तो चार फुट खोल आहे. कारण येथे रस्त्यांची उंची वाढवली तर वाहने पाटाच्या चारीच्या पुलाला अडकतात. त्यामुळे रस्त्याची उंची वाढवता येत नाही. ही चारी बांधुन ८ ते १० वर्ष उलटली आहे. परंतु या चारीला पाणी अजुनही आले नाही. कारण ही चारी रस्त्यावरती जितकी उंच आहे. त्यापेक्षा पुढे ती जास्त उंच आहे. त्यामुळे या चारीत जमिनी जावुनही येथील शेतकऱ्यांना अजुन पाणी मिळाले नाही. पाणी शेतीसाठी मिळाले नाही. मात्र हे पाणी रस्त्यावर साचते. व रस्ता बंद होतो.सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या चुकीच्या धोरणाचा फटका येथील शेतकऱ्यांना व वाहनचालकांना बसत आहे. चारीची उंची कमी असल्याने काठापुर गावाला मागील दहा वर्षात चारीचे काम होऊनही पाणी मिळाले नाही. कारण पाणी पुढे जातच नाही. वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी पाटाच्या पाण्याचे प्रयत्न सोडून दिले आहे. पाणी तर येतच नाही. कारण या चारीची उंची कमी असल्याने या चारीखालुन असणारा रस्ता खोल केला गेला आहे.