शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

निराधार बालकांबाबत मंत्र्यांकडून चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:31 IST

अनाथ, निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या निवासी संस्थांप्रती कमालीची अनास्था आहे. हिवाळी अधिवेशनात या खात्याच्या मंत्र्यांनीच बालगृहांची आणि

मुंबई : अनाथ, निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या निवासी संस्थांप्रती कमालीची अनास्था आहे. हिवाळी अधिवेशनात या खात्याच्या मंत्र्यांनीच बालगृहांची आणि त्यातील बालकांच्या संख्येची विसंगत आकडेवारी सांगून दिशाभूल केल्याचा आरोप बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेने केला आहे. ९१ हजार ३४४ ऐवजी १४ हजार बालके असल्याची चुकीची माहिती मंत्र्यांनी दिल्याचा तसेच ही आकडेवारी तीन वर्षांपूर्वीची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.स्वयंसेवी बालगृहांच्या थकीत भोजन अनुदानाचा प्रश्न आमदार अतुल सावे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात दोन ते तीन वर्षांपूर्वीची ११०५ बालगृहांत ९१ हजार ३४४ बालके असल्याची जुनी आकडेवारी देत आजची वस्तुस्थिती दडविली. प्रत्यक्षात ७५० संस्थांमध्ये १४ हजार बालके आहेत. २१५ बालगृहांची मान्यता गेल्या महिन्यातच रद्द केलेली असताना संस्थांचा आकडा फुगवून सांगण्यामागची मंत्र्यांची भूमिका चुकीची असल्याचे बालगृह चालक संघटनेने म्हटले आहे.दरम्यान, सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांना मोघम उत्तरे देऊन बालगृहांच्या मूळ प्रश्नांना भिजत ठेवण्याच्या ‘महिला बालविकास’च्या नकारात्मक वृत्तीचा फटका बालकांना बसत आहे. ‘बालगृह’या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडत असल्याचे बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्रकुमार जाधव यांनी सांगितले.