शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

फडणवीसांनी हळूच पेन काढला, एक नाव लिहिलं अन् CM शिंदेंकडे कागद सरकवला, नाव होतं...!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:05 IST

मुख्यमंत्री शिंदे एक निर्णय जाहीर करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

मुंबई-

राज्याच्या कॅबिनेटची महत्वाची बैठक आज झाली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान, नगरपंचायत-बाजारसमितीच्या अध्यक्षांची थेट निवड यासारखे महत्वाचे निर्णय जाहीर केले. राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केला. तसंच नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदान योजनेतून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वगळण्यात येणार नाही असाही महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पण हा निर्णय जाहीर करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येते. पण पश्चिम महाराष्ट्रात पूर आला की कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येत होतं. याबाबतच्या तक्रारी स्थानिक खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केल्या होत्या अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

नेमकं काय घडलं?"कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं पण पश्चिम महाराष्ट्रात पूर आल्यानंतर पूरग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येत होतं. त्यांना वगळलं जाऊ नये अशी मागणी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर आणि इतर आमदारांकडून वारंवार करण्यात येत होती", असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे भाजपाच्या खासदाराचं नाव घेण्यास विसरल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी हळूच खिशातून पेन काढला आणि टेबलवर असलेल्या एका कागदावर खासदार धनंजय महाडिक यांचं नाव लिहिलं. कागद हळूच मुख्यमंत्र्यांपुढे केला आणि मुख्यमंत्र्यांनीही लागलीच कागदावरील नाव वाचून धनंजय महाडिकांचंही नाव घेतलं. 

संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडिओ- (बातमीत नमूद किस्सा खालील व्हिडिओच्या ८ व्या मिनिटापासून पुढे पाहता येईल)  

नेमकी घोषणा काय?नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येतं. पण कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली की या अनुदानातून शेतकऱ्यांना वगळण्यात येत होतं. त्यामुळे पूर आला तरी शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवलं जाऊ नये अशी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पूरग्रस्त भाग असला तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही असं जाहीर केलं आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक