शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

फडणवीस काकूंचा टोलविरोधी लढा!

By admin | Updated: January 17, 2015 06:52 IST

राज्यातून टोल हद्दपार करणार, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला

नागपूर : राज्यातून टोल हद्दपार करणार, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला की काय, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनीच आता टोलविरोधी लढा देण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्राने आजवर ‘काका-पुतण्यांचे राजकारण अनुभवले आहे. आता ‘काकू-पुतण्या’चे राजकारण किती रंगते, याचे औत्सुक्य सर्वांना लागून आहे.नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी व मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असून, येथे अवैधरीत्या वसुली करण्यात येत आहे, असा थेट आरोप आ. शोभा फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्या म्हणाल्या, टोलनाके असलेला हा मार्ग ९५ कि.मी. लांब अंतराचा असला, तरी प्रत्यक्षात याचे बांधकाम ५८ कि.मी. झालेले आहे. प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली करता येते. मात्र ६० टक्के काम पूर्ण झाल्यावर कंपनीने टोल वसुली सुरू केली आहे. टोल वसुलीचे कंत्राट २०३७पर्यंत असताना कंपनीने दोन वर्षांत संपूर्ण खर्च वसूल केलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, या टोलनाक्याविरोधात केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी जनतेच्या खिशातून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करीत असल्यामुळे या टोलविरोधात २१ जानेवारीपासून आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. फडणवीस यांनी दिला. या इशाऱ्यामुळे भाजपाच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.