शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

फडणवीस काकूंचा टोलविरोधी लढा!

By admin | Updated: January 17, 2015 06:52 IST

राज्यातून टोल हद्दपार करणार, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला

नागपूर : राज्यातून टोल हद्दपार करणार, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला की काय, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनीच आता टोलविरोधी लढा देण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्राने आजवर ‘काका-पुतण्यांचे राजकारण अनुभवले आहे. आता ‘काकू-पुतण्या’चे राजकारण किती रंगते, याचे औत्सुक्य सर्वांना लागून आहे.नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी व मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असून, येथे अवैधरीत्या वसुली करण्यात येत आहे, असा थेट आरोप आ. शोभा फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्या म्हणाल्या, टोलनाके असलेला हा मार्ग ९५ कि.मी. लांब अंतराचा असला, तरी प्रत्यक्षात याचे बांधकाम ५८ कि.मी. झालेले आहे. प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली करता येते. मात्र ६० टक्के काम पूर्ण झाल्यावर कंपनीने टोल वसुली सुरू केली आहे. टोल वसुलीचे कंत्राट २०३७पर्यंत असताना कंपनीने दोन वर्षांत संपूर्ण खर्च वसूल केलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, या टोलनाक्याविरोधात केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी जनतेच्या खिशातून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करीत असल्यामुळे या टोलविरोधात २१ जानेवारीपासून आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. फडणवीस यांनी दिला. या इशाऱ्यामुळे भाजपाच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.