शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

राज्यपालांच्या निर्देशाकडे फडणवीस सरकारचीही डोळेझाक

By admin | Updated: August 24, 2016 20:39 IST

विकास निधी वाटपाबाबत आघाडी सरकारवर राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नसल्याचा ठपका होता

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 24  : विकास निधी वाटपाबाबत आघाडी सरकारवर राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नसल्याचा ठपका होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे सरकारसुद्धा राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांकडे डोळेझाक करीत आहे, अशी टीका विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांनी केली.

महामंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात ३७१ कलम लागू झाल्यापासून राज्यपाल हे विकास निधीचे वाटप करतात. परंतु त्या निधी वाटपाबाबत राज्यपाल जे निर्देश देतात ते तत्कालीन राज्य सरकार पाळत नाही म्हणून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि बी.टी. देशमुख यांनी न्यायालयात सरकारविरुद्ध एक याचिका दाखल केली होती. याविरुद्ध तत्कालीन पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती. यात निधी वाटपाचे अधिकार विधिमंडळाला आहे. राज्यपालांना नाही. त्यांनी आदेश दिले तरी ते पाळणे बंधणकारक नाही, असा युक्तिवाद मांडला होता. ६ मे २००८ रोजी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आदेश दिले. त्यात न्यायालयाने स्पष्ट म्हटले होते की, राज्यपालांनी निधी वाटपासंदर्भात दिलेले आदेश हे राज्य सरकारला पाळणे बंधणकारक आहे. ती याचिका देवेंद्र फडणवीस जिंकले होते, याची आठवण अ‍ॅड. किंमतकर यांनी करून दिली.

ज्या देवेंद्र फडणवीस यांनी ही याचिका दाखल केली आणि जिंकली तेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याच्या सरकारकडून तरी राज्यपालांच्या निर्देशाचे पालन होणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.

अमरावती विभागातील सिंचन विभागातील सर्व रिक्त जागा चार महिन्यात भरा आणि मागील तीन वर्षात विकास निधीचे वाटप ज्या प्रमाणात झाले, त्या प्रमाणात खर्च झाला किवा नाही, याची माहिती जुलै २०१६ पर्यंत सादर करा. त्याची पुस्तिका काढा, असे निदेर्श राज्यपालांनी ११ मार्च २०१६ रोजी सरकारला निर्देश दिले होते. आता पाच महिने होत आहेत. परंतु अमरावती विभागातील सिंचन विभागात अजूनही ३३ टक्के पदे रिक्त आहेत आणि विकास निधी खर्च झाल्याबाबतची माहिती सरकारने अजूनही दिलेली नाही. त्यामुळे हे सरकारही राज्यपालांच्या निर्देशाबाबत उदास्ीान असल्याची टीका अ‍ॅड. किंमतकर यांनी केली आहे.