शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या ब्लू प्रिंटवर फडणवीस सरकार चालते- राज ठाकरे

By admin | Updated: April 21, 2016 20:53 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विकास आराखडय़ातील सर्व योजना माझ्या ब्ल्यू प्रिंटमधीलच आहेत.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. २१- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विकास आराखडय़ातील सर्व योजना माझ्या ब्ल्यू प्रिंटमधीलच आहेत. याबद्दल कुणी शाबासकी देत नाहीत. ब्ल्यू प्रिंट येण्यापूर्वी कुठे आहे ती? असे विचारणारे आता याबद्दल कुणी काहीच विचारत नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.
विविध खटल्यांमध्ये निलंगा, परांडा येथील न्यायालयात हजर राहण्यासाठी ठाकरे येथे मुक्कामाला आले आहेत. गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने त्यांनी मराठवाडय़ातील दुष्काळी भागांची पाहणी केली. मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये दुष्काळावर कोणत्या उपाययोजना सांगितल्या आहेत, असे विचारले असता, लवकरच आपण औरंगाबाद येथे पाणी या विषयावर कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेणार आहोत. यामध्ये प्रश्न आणि उपाययोजनांवर ब्ल्यू प्रिंटच्या अनुषंगाने चर्चा करू, कार्यकर्त्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ब्ल्यू प्रिंट येण्याआधी माध्यमांकडून ती कधी येणार म्हणून सारखे विचारले जायचे; पण आता ती आली आहे; पण कुणी विचारत नाही. फडणवीस सरकार ब्ल्यू प्रिंटमधील योजनाच राबवत आहे; पण साधी शाबासकीही नाही. या सरकारने 33 हजार विहिरी बांधल्याचा दावा केला; पण त्या कुठे आहेत. एक तरी विहीर दाखवा. एकावर एक विहिरी बांधल्या का? विहिरींचा टॉवर उभा केला आहे का? असे प्रश्न त्यांनी आपल्या खास शैलीत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
काँग्रेस आघाडी सरकारपेक्षा भाजप - शिवसेना सरकार काही वेगळे नाही. लातूरमध्ये रेल्वेने पाणी पुरवठा केला जातोय. हा काही दुष्काळावर उपाय आहे का? दुष्काळाचा संदर्भ घेऊन फडणीस सरकारचे मंत्री आघाडी सरकारवर टीका करतात; पण आता तुम्हालाही येऊन दीड वर्षे झाली उगीच लोकांची उणीधुणी का काढता, अशीही त्यांनी खडसावून टीका केली. भाजपकडे तर माणसेच नाहीत. भाडय़ाने माणसे आणून त्यांना ते लढवितात, अशी टीका त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे उपस्थित होते.
 
विदर्भाचा मुद्दा लक्ष वळविण्यासाठी
जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठ वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. विदर्भातील किती लोकांना आपण वेगळं व्हावं वाटते, हे जाणून घ्या. आता वेगळ्या मराठवाडय़ाची टूम निघाली आहे. श्रीहरी अणे मुंबईत राहतात. समुद्रकिनारी त्यांचे घर आहे आणि विदर्भ, मराठवाडय़ाचा मुद्दा उपस्थित करतायेत. त्यांच्या वकिली ज्ञानाबद्दल शंका नाही; पण ते निरर्थक प्रश्न उपस्थित करीत आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
 
व्यंगचित्रांना वेळ मिळत नाही
व्यंगचित्रे काढायची आहेत; पण सध्या वेळ मिळत नाही, असे सांगून ठाकरे यांनी वर्तमानपत्र काढण्याचा विचार व्यक्त केला. सरकारची आणि त्यांच्या माणसाची भूमिका मला पटत नाही. त्यामुळे मी वर्तमानपत्र काढू शकते, असेही ते म्हणाले.