शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

फडणवीसांनी चांगला ज्योतिषी शोधावा: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 14:31 IST

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता.

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे आरोप सतत भाजपकडून करण्यात येत आहे. तर याच मुद्यावरून राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचा समाचार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांचे सर्वचं अंदाज चुकतायत त्यामुळे त्यांनी चांगला ज्योतिषी शोधावा अशी बोचरी टीका थोरात यांनी केली आहे.

थोरात हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता.

त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले होते. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली असल्याचे थोरात म्हणाले. तर फडणवीस यांच्या या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवत, फडणवीसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगवाला.

तर नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असेही यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.