शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:40 IST

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पीक विम्याचा मुद्दा पुढे करत शिवसेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर विधानसभेत युती होणारच असे म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये परस्परविरोधी भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनांतर्गत दिलासा मिळाल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा दावा करत आहे.

विधानसभा निवडणुकीत पुन्हा युती होणार असल्याचे बोलले जात असले तरीही, शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गेली पाच वर्षे शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने आत पीक विम्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये पीक विम्यावरून परस्परविरोधी भूमिका असल्याचे समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत होते. तर दुसरीकडे त्यांच्याच सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनेकदा, खासगी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जन आशीर्वाद यात्रेतून  केला होता.  नुकसानग्रस्त शेतकरी हक्काचे पैसे मागायला गेले तेव्हा तुमच्या गावाचे नुकसान झाले नाही, केवळ तुमच्या शेताचे झाले, अशी उत्तरे कंपन्यांनी दिली असल्याचा दावा सुद्धा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला होता. 

भाजप-सेनेत युतीसाठी दोन्ही पक्षाकडून प्रयत्न होत असले तरीही, मात्र शिवसेनेकडून भाजपवर टीका सुरूच आहे. आधी पीक कर्ज, पीक विमा आणि त्यातच आता आर्थिक मंदीचा मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षामधील परस्परविरोधी भूमिका पुन्हा समोर आली आहे.