शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

फडणवीस ‘बोगस’, सदाभाऊ ‘भामटा’, तर पवार ‘अविश्वासू’ - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 07:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.

स्वातंत्र्यानंतर देशात ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात रविवारी (10 फेब्रुवारी) एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यामध्ये ‘रॅपिड फायर’मध्ये ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

शरद जोशी यांचा महामानव असा उल्लेख करत शेट्टी यांनी चर्चेला सुरुवात केली. आंदोलन आणि दंगल यात फरक असून, दंगलीबद्दल तिरस्कार असतो. आंदोलनातून इतरांना त्रास होतो, हे जरी खरे असले, तरी शिवारातील वेदना घरापर्यंत पोहोचली तर स्फोट होण्यास वेळ लागत नाही. शेतकरी नेत्यांत जरूर मतभिन्नता आहे; पण ध्येय एकच आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत देशपातळीवर अनेक आंदोलने उभारली, त्या माध्यमातून काही मागण्या मान्यही करून घेतल्या. काँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत जाणार हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे. राज्य घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.शेट्टींना केलेले प्रश्न, कंसात उत्तरे

शेतकरी की लेखक (लेखक), दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच), कोणाची भीती वाटते (भीतीच नाही), राग आला तर (डोळे मिटतो), मनाला लागलेला आरोप (जमिनी घेतल्याचा), काय करायला नको होते (महायुती).

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारSadabhau Khotसदाभाउ खोत