शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

"कारखाना कर्नाटकात आणि उद्योजक महाराष्ट्रात; चढ्या वीजदराचा असाही फटका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:06 IST

सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : राज्यात उद्योगांना महागडी वीज विकत घ्यावी लागते आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या शेजारच्या राज्यात ३० ते ४० टक्के कमी दरात मिळत असल्याने राज्यातील वीज उद्योगांना परवडेनासा झाली आहे. सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता एमआयडीसीच वीज वितरणाचा परवाना घेणार असून त्या माध्यमातून कमी दरात उद्योगांना वीज देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यात औद्योगिक विजेचा दर ९ तर १० रूपये प्रति युनिट आहे. तर शेजारच्या राज्यात हाच दर ६ ते ७ रूपये आहे. कमी दरात वीज उपलब्ध असताना महाराष्ट्राची वीज महाग का, याचे समाधानकारक उत्तरच आपल्याला उद्योगांना देता येत नाही. शेतीला एक रूपया दराने वीज दिली जाते. शेती क्षेत्र महत्वाचे आहे. ये वाचायला हवे. पण या क्षेत्राला वाचवताना त्याचा सारा भार इतर दुस-या क्षेत्रावर टाकला जात आहे. दहा हजार कोटींचा बोजा उद्योगांना चढ्या दराने वीज विक्री करून उतरवला जात आहे. त्याचा दुष्परिणाम उद्योगधंद्यांवर होत असल्याचे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले. 

या समस्येवर मात करण्यासाठी एमआयडीसीच आता वीज वितरणाचा परवाना घेणार आहे. त्यामुळे देशात कमी दरात उपलब्ध असलेली वीज योग्य दरात उद्योगांना दिली जाईल. त्यामुळे सर्व आमदारांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही उद्योग मंत्री देसाई यांनी केले.