शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

"कारखाना कर्नाटकात आणि उद्योजक महाराष्ट्रात; चढ्या वीजदराचा असाही फटका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:06 IST

सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : राज्यात उद्योगांना महागडी वीज विकत घ्यावी लागते आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या शेजारच्या राज्यात ३० ते ४० टक्के कमी दरात मिळत असल्याने राज्यातील वीज उद्योगांना परवडेनासा झाली आहे. सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता एमआयडीसीच वीज वितरणाचा परवाना घेणार असून त्या माध्यमातून कमी दरात उद्योगांना वीज देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यात औद्योगिक विजेचा दर ९ तर १० रूपये प्रति युनिट आहे. तर शेजारच्या राज्यात हाच दर ६ ते ७ रूपये आहे. कमी दरात वीज उपलब्ध असताना महाराष्ट्राची वीज महाग का, याचे समाधानकारक उत्तरच आपल्याला उद्योगांना देता येत नाही. शेतीला एक रूपया दराने वीज दिली जाते. शेती क्षेत्र महत्वाचे आहे. ये वाचायला हवे. पण या क्षेत्राला वाचवताना त्याचा सारा भार इतर दुस-या क्षेत्रावर टाकला जात आहे. दहा हजार कोटींचा बोजा उद्योगांना चढ्या दराने वीज विक्री करून उतरवला जात आहे. त्याचा दुष्परिणाम उद्योगधंद्यांवर होत असल्याचे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले. 

या समस्येवर मात करण्यासाठी एमआयडीसीच आता वीज वितरणाचा परवाना घेणार आहे. त्यामुळे देशात कमी दरात उपलब्ध असलेली वीज योग्य दरात उद्योगांना दिली जाईल. त्यामुळे सर्व आमदारांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही उद्योग मंत्री देसाई यांनी केले.