शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

By admin | Updated: February 25, 2015 02:13 IST

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या

यवतमाळ : राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या एका आदेशाने सुकर झाला आहे. सुमारे दीड वर्षापासून या बदल्या रखडल्या होत्या. ९ मार्चपूर्वी या बदल्या करण्याची लेखी हमी पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. एसआरपीएफमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांची जिल्हा पोलीस दलात बदली केली जाते. त्यासाठी तेथील पोलीस भरतीच्या दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या जातात. परंतु २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून जवानांच्या बदल्या थांबविल्या गेल्या होत्या. या विरोधात पुणे येथील एसआरपीएफचे सहायक फौजदार नितीन पराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. नरेश पाटील व न्या. ए.एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. एसआरपीएफ जवानांच्या रखडलेल्या बदल्या दोन आठवड्यांत करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. एसआरपीएफच्या अपर महासंचालकांतर्फे पोलीस उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वत: न्यायालयात उपस्थित राहून ‘दोन आठवड्यांत बदल्या करून यादी न्यायालयापुढे ठेवू’ अशी लेखी हमी दिली. (प्रतिनिधी)