शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

By admin | Updated: February 25, 2015 02:13 IST

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या

यवतमाळ : राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या एका आदेशाने सुकर झाला आहे. सुमारे दीड वर्षापासून या बदल्या रखडल्या होत्या. ९ मार्चपूर्वी या बदल्या करण्याची लेखी हमी पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. एसआरपीएफमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांची जिल्हा पोलीस दलात बदली केली जाते. त्यासाठी तेथील पोलीस भरतीच्या दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या जातात. परंतु २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून जवानांच्या बदल्या थांबविल्या गेल्या होत्या. या विरोधात पुणे येथील एसआरपीएफचे सहायक फौजदार नितीन पराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. नरेश पाटील व न्या. ए.एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. एसआरपीएफ जवानांच्या रखडलेल्या बदल्या दोन आठवड्यांत करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. एसआरपीएफच्या अपर महासंचालकांतर्फे पोलीस उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वत: न्यायालयात उपस्थित राहून ‘दोन आठवड्यांत बदल्या करून यादी न्यायालयापुढे ठेवू’ अशी लेखी हमी दिली. (प्रतिनिधी)