शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

आमने-सामने : खरा दसरा मेळावा नेमका कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 10:29 IST

खरा दसरा मेळावा नेमका कुणाचा, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

दसरा मेळावा ही शिवसेनेची पारंपरिक संस्कृती आहे. आम्ही हा सोहळा म्हणून साजरा करतो, राजकीय व्यासपीठ म्हणून नाही. याची सुरुवात बाळासाहेबांनी केली आहे. मी ४० वर्षे शिवसेनेच्या प्रवाहात पदाधिकारी म्हणून आहे. आतापर्यंत मी पाहिले आहे की सेना भवनवरून दसरा मेळाव्याचे नियंत्रण दिले जाते. मग सेना भवन काय यांच्या ताब्यात आहे का? आजही सेना भवनवर शिवसेनेचे प्रभुत्व आहे. उद्धव ठाकरे सेना भवन चालवतात. आम्ही आमदार म्हणून शिवसेनेच्या निशाणीवर निवडून आलो आहोत, आमदारांनी शिवसेना निवडून आणलेली नाही. त्यामुळे आमदार, खासदार कोणाबरोबर आहेत म्हणजे त्यांच्यासोबत पक्ष आहे, असे होत नाही. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. आमच्याबरोबर असताना ज्यांना तोंडही उघडता येत नव्हते, ते आता फार बोलू लागले आहेत. कारण त्यांचे प्रबोधन दिल्लीवरून होते. सामान्य शिवसैनिक आमच्याबरोबरच आहे. दसऱ्या मेळाव्याची नुसती परवानगी मिळाली, तेव्हा शिवसैनिकांनी जल्लोष केला, तो जल्लोष कसला होता? बाळासाहेबांनी दसरा मेळावा सुरू केला, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी ही परंपरा सुरू ठेवली. कुठल्या दसरा मेळाव्यात आतापर्यंत एकनाथ शिंदे बोलले आहेत?दसरा मेळाव्याला शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. दरवेळी दसरा मेळाव्यानंतर नवा विचार घेऊन महाराष्ट्रभर जातात. लोकांचे प्रश्न सोडवितात. शिवसेनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवतात. छोटे गाव, वाडी-वस्तीवरून शिवसैनिक मुंबईत येतात. त्यांच्यात प्रचंड उत्साह संचारलेला असतो. दसरा मेळावा म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचे टॉनिकच असते. शिवसेनाप्रमुखांपासून ही समृद्ध परंपरा शिवसेनेला लाभली आहे. कितीही आले, गेले तरी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली नाही, होणारही नाही.अजय चौधरी, शिवसेना गटनेते, विधानसभा

हा दसरा मेळावा आम्ही आमचा मानतो आहे. कारण दसरा मेळाव्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्यांचे विचारच ज्यांना पटत नव्हते, ते सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पायाशी जाऊन बसले. ज्यांच्यावर आयुष्यभर बाळासाहेबांनी टीका केली. त्यांचे हिंदुत्वाचे विचार असतील, मराठी माणसाचे विचार असतील, हे सगळे त्यांनी सोडले म्हणून हा गट बाहेर पडला. एका पक्षातील ४० आमदार बाहेर पडणे ही देशातील सगळ्यात मोठी घटना होती. त्यामुळे हा मेळावा आमचा आहे. तुम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे नसतील तर केवळ ‘शो’ म्हणून तुम्ही दसरा मेळावा का करताय? परंपरा आहे म्हणून गणपती घरी आणायचा, असा तुम्हाला सण साजरा करायचा आहे का? तुम्हाला बाळासाहेबांचे विचार नको असतील तरी आम्हाला त्या प्रथा- परंपरा कायम ठेवायच्या आहेत. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यांनी बाळासाहेबांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख करणे बंद केले होते. वंदनीय, असा ते उल्लेख करायचे. आता सरकार गेल्यानंतर हिंदुहृदयसम्राट म्हणायला सुरुवात केली.सोनिया गांधींनी आडकाठी केली होती का? उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवली होती, म्हणजे वडील जे करतात ते त्यांनी सुरू ठेवले; पण तो एक दिखावा होता. जर परंपरा होती आणि ती मनापासून होती, तर बाळासाहेब ज्या काँग्रेसला शिव्या घालत होते त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसलात? नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून अडीच वर्षे सरकार चालवले. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचे प्रयत्न केले, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही शपथ घेतली. तेव्हा कुठे गेली होती परंपरा. यांनी सर्व परंपरा आणि विचारांना तिलांजली वाहिलेली आहे. एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने त्या प्रथा, परंपरा पुढे नेण्याचे काम करत आहेत.किरण पावसकर,प्रवक्ते, शिंदे गट

शब्दांकन - दीपक भातुसे

टॅग्स :DasaraदसराShiv Senaशिवसेना