शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एक्स्प्रेस-वे जाम

By admin | Updated: August 17, 2014 23:19 IST

दिवसभर वाहतूक कोंडी; सलग सु˜्या आल्याने वाहनांची गर्दी

खालापूर : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूककोंडीचा फटका दिवसभर प्रवाशांना बसला. सलग चार दिवस सु˜ी आल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून हजारो वाहने मुंबईबाहेर पडल्याने पहाटेपासून एक्स्प्रेस-वे वाहनांनी जाम झाला होता. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिक कर्जत, खालापूर, पाली, लोणावळा, अलिबाग, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी एक्स्प्रेस-वेमार्गे वळल्याने हजारो वाहनांच्या गर्दीने एक्स्प्रेस-वेवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यातच खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. किमान ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या आणखीनच बिकट झाली होती . बोरघाट ते खंडाळादरम्यान घाट सेक्शन भागात दिवसभर वाहतूककोंडी होती. पुण्याकडे जाणारी वाहतूक लोणावळ्यापर्यंत विस्कळीत झाली होती. सायंकाळनंतर अवजड वाहनांची गर्दी वाढल्याने घाटात वाहतूक धीम्यागतीने सुरू होती.