शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शोषणापासून शिक्षणापर्यंत : मुलांना हवी जागतिक मदत

By admin | Updated: June 11, 2017 01:16 IST

१२ जून हा बालकामगारविरोधी दिन. १९९0च्या सुमारास संयुक्त राष्ट्रांनी असे जाहीर केले होते की २000 साल येईपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल. मात्र, प्रत्यक्षात असे

- कैलाश सत्यार्थी१२ जून हा बालकामगारविरोधी दिन. १९९0च्या सुमारास संयुक्त राष्ट्रांनी असे जाहीर केले होते की २000 साल येईपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडताना दिसले नाही. उलट, २0१६च्या जागतिक बालकामगार दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बालकामगारविरोधी अनेक कडक कायदे केल्यानंतरही जगभरात आजही सुमारे १६८ दशलक्ष मुलांचे निर्दयीपणे शोषण केले जात आहे. आजही, ६00 दशलक्षाहून अधिक लहान मुले दारिद्र्यात जगत आहेत. शिक्षण हा या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पुढच्या पिढीच्या नशिबीही हा दुर्विलास येऊ नये, याची खातरजमा करणे, हे आपल्यापुढील एक नैतिक आव्हान आहे.२00२मध्ये १२ जून हा दरवर्षी बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे बालकामगार निर्मूलनात जागतिक समुदाय सातत्याने लक्ष घालेल आणि त्यासाठी सक्रिय राहील, याची खातरजमा झाली. जागतिक समुदायाने या मुद्द्यावर सातत्याने लक्ष द्यायला हवे, हे नक्कीच. १९९0च्या सुमारास संयुक्त राष्ट्रांनी असे जाहीर केले होते की २000 साल येईपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडताना दिसले नाही. उलट, २0१६च्या जागतिक बालकामगार दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बालकामगारविरोधी अनेक कडक कायदे केल्यानंतरही जगभरात आजही सुमारे १६८ दशलक्ष मुलांचे निर्दयीपणे शोषण केले जात आहे.गेल्या काही वर्षांत निर्वासित मुले आणि मुलांची तस्करी यात लक्षणीय वाढ झाल्याचेच या प्रत्यक्षातील गंभीर परिस्थितीवरून लक्षात येते. जगातील एकूण लोकसंख्येत लहान मुलांचा वाटा एक तृतीयांश आहे. मात्र, निर्वासितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण ५0 टक्क्यांहून अधिक आहे. मागील १0 वर्षांत जवळपास १0 दशलक्ष मुले युद्ध आणि लढायांमध्ये मारली गेली तर ६0 लाखांहून अधिक अपंग झाली. अंदाजे २८ दशलक्ष निर्वासित मुलांना कोणतेही भवितव्य उरलेले नाही. सिरिया आणि अफगाणिस्तान या ठिकाणीच २0१५मध्ये मुलांच्या ५0 टक्क्यांहून अधिक निर्वासित होण्याच्या आणि इतर दुर्घटना घडल्यात. अगदी अचूक आणि विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नसली तरीही निर्वासित होण्याच्या या घटनांमध्ये लहान मुलांच्या तस्करीने फार मोठी मजल मारली आहे, हे नक्की.बालकामगार आणि मुलांच्या तस्करीच्या संदर्भात जागतिक समुदायाने पुन्हा एकदा, अत्यंत तातडीची निकड म्हणून या समस्येवर लक्ष द्यायला हवे आणि सक्रिय हालचाली करायला हव्यात. ही समस्या बहुविध पातळ्यांवर सोडवायला हवी. आध्यात्मिक गुरूंना यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अधिक परिणामकारकरीत्या सहभागी करून घेणे आवश्यक आहे. कोणताही धर्म लहान मुलांच्या शोषणाला मान्यता देत नाही. उलट, सर्वच धर्मांमध्ये लहान मुलांचे रक्षण करणे हे पवित्र कार्य मानले जाते. धर्माप्रमाणेच सांस्कृतिक पातळीवरही या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. जवळपास सर्व समाजगटांमध्ये, तथाकथित मागास म्हणवल्या जाणाऱ्या समाजापासून सर्वाधिक पुढारलेल्या समाजापर्यंत सगळीकडेच लहान मुलांना जपले जाते, त्यांचे बालपण साजरे केले जाते. अगदी स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत आपण या सांस्कृतिक वारशाला एका चिरकालीन मोहिमेत रूपांतरित करायला हवे.धर्म आणि संस्कृती यातून आपल्याला मुलांसाठी एक सुयोग्य जगाची निर्मिती करण्यासाठी नैतिक पाया मिळतो. तर, हे कार्य तडीस नेण्यासाठी अर्थव्यवस्थेतून आपल्याला साधने आणि स्रोत उपलब्ध होतील. रोजगाराच्या, उत्पन्नाच्या संधींचा अभाव हे बालकामगार निर्माण होण्याचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेगा आणि मध्यान्ह भोजन यांसारख्या जनकल्याण मोहिमांमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीच; त्याचबरोबर बालकामगारांच्या संख्येतही घट झाली. मात्र, ही आर्थिक लढाई दीर्घकालीन आणि खडतर असणार आहे. आजही, ६00 दशलक्षाहून अधिक लहान मुले पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहेत. शिक्षण हा या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. कोणताही सुसंस्कृत समाज बालकामगार पद्धतीचे समर्थन करणार नाही. कारण, अत्यंत परिणामकारक, सक्षमीकरण, समानता आणणाऱ्या आणि सबळीकरणाला चालना देणाऱ्या शिक्षण या साधनस्रोतातील, प्रक्रियेतील हा मोठा अडथळा ठरतो. शिवाय, २१0 दशलक्ष तरुण बेरोजगार असताना १६८ दशलक्ष मुलांना बालकामगारीच्या दलदलीत ढकलण्याचे आपण काय समर्थन करणार आहोत? पुढच्या पिढीच्या नशिबीही हा दुर्विलास येऊ नये, याची खातरजमा करणे, हे आपल्यापुढील एक नैतिक आव्हान आहे.बालकामगार पद्धतीच्या निर्मूलनाची मागणी करण्यासाठी ढाका, ओस्लो, साओ पावलो, पॅरिस, बँकॉक, केप टाऊन आणि काबुलमधील लाखोंचा समुदाय १९९८ साली ग्लोबल मार्च अगेंस्ट चाइल्ड लेबर या संचलनात सहभागी झाला होता. त्या वेळचा एक अत्यंत प्रभावी संदेश होता : शोषणापासून शिक्षणापर्यंत. पुन्हा एकदा जागतिक पातळीवर एक मोठा प्रयत्न करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.(लेखक २0१४मधील शांततेसाठीचे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे.)

शब्दांकन - चेतन ननावरे