शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

By admin | Updated: December 31, 2014 10:00 IST

राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.

मुंबई/ सांगली : राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत याविषयीचे सूतोवाच केले. आणखी १२ जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. विस्तारामध्ये भाजपाला सहा मंत्रिपदे तर मित्रपक्षांना सहा मंत्रिपदे मिळतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने दोन राज्य मंत्रिपदे रिक्त ठेवलेली आहेत. याचा अर्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल, असे मानले जात आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती; पण ती त्यांनी अमान्य करीत केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. राज्यात रिपाइंच्या वाट्याला येऊ पाहणारे मंत्रिपद भाजपाला द्यावे आणि आठवले यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा प्रस्ताव भाजपाकडून येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)सध्या राज्य मंत्रिमंडळात भाजपाचे २० आणि शिवसेनेचे १० मंत्री आहेत. आपल्या मंत्रिमंडळाचा आकार फार मोठा नसेल, असे फडणवीस यांनी सुरुवातीला म्हटले होते. मात्र पाटील यांचे विधान लक्षात घेता ४२ जणांचे मंत्रिमंडळ असेल, असे मानले जात आहे.