शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कार्यकारिणी बरखास्त

By admin | Updated: November 25, 2015 03:31 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत.

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. पक्षांतर्गत वाढती गटबाजी व मतभेदामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असाऊद्दीन ओवेसींनी हा निर्णय घेतला आहे.गेल्या वर्षी वांद्रे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र वांद्रे पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराला डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की पत्करावी लागली. तेव्हापासून पक्षांतर्गत कुरबुरीच्या चर्चा चव्हाट्यावर आल्या होत्या. मात्र आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांत वादही झाला होता. नवीन कार्यकारिणीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून सक्षम, सुशिक्षित, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल, असे खा. ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य सर्व जिल्ह्णांचे दौरे करून पाहणी करतील. त्यानंतर एप्रिलमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. कोअर कमिटीतील सदस्यसय्यद मोईन (नांदेड), अंजुम इनामदार (पुणे), मौलाना मेहफजुर, रहेमान, डॉ. गफार कादरी, पंडीत बोरडे (सर्व औरंगाबाद), मोहम्मद अली (लातूर), मोहम्मद सलीम (नागपूर), इब्राहिम अली अबू (नांदेड) व अ‍ॅड. विलास डोंगरे (नागपूर) महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढत आहे. नवीन व होतकरू, अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. प्रत्येक पक्षात मतमतांतरे असतात, त्याचा अर्थ मोठे मतभेद, दुफळी निर्माण झाल्याचे समजणे चुकीचे आहे. पक्षाच्या पुनर्स्थापनेसाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन निवडीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल.-आ.अहमद बाला, महाराष्ट्र प्रभारी, एमआयएम