शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कार्यकारिणी बरखास्त

By admin | Updated: November 25, 2015 03:31 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत.

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. पक्षांतर्गत वाढती गटबाजी व मतभेदामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असाऊद्दीन ओवेसींनी हा निर्णय घेतला आहे.गेल्या वर्षी वांद्रे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र वांद्रे पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराला डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की पत्करावी लागली. तेव्हापासून पक्षांतर्गत कुरबुरीच्या चर्चा चव्हाट्यावर आल्या होत्या. मात्र आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांत वादही झाला होता. नवीन कार्यकारिणीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून सक्षम, सुशिक्षित, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल, असे खा. ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य सर्व जिल्ह्णांचे दौरे करून पाहणी करतील. त्यानंतर एप्रिलमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. कोअर कमिटीतील सदस्यसय्यद मोईन (नांदेड), अंजुम इनामदार (पुणे), मौलाना मेहफजुर, रहेमान, डॉ. गफार कादरी, पंडीत बोरडे (सर्व औरंगाबाद), मोहम्मद अली (लातूर), मोहम्मद सलीम (नागपूर), इब्राहिम अली अबू (नांदेड) व अ‍ॅड. विलास डोंगरे (नागपूर) महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढत आहे. नवीन व होतकरू, अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. प्रत्येक पक्षात मतमतांतरे असतात, त्याचा अर्थ मोठे मतभेद, दुफळी निर्माण झाल्याचे समजणे चुकीचे आहे. पक्षाच्या पुनर्स्थापनेसाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन निवडीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल.-आ.अहमद बाला, महाराष्ट्र प्रभारी, एमआयएम