शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

आयुक्त जयस्वाल यांना ठार मारण्याचे दलालांचे कारस्थान

By admin | Updated: February 12, 2017 02:29 IST

महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता

ठाणे : महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता. परंतु, त्यांनाच दलालांनी ठार मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, त्यामुळेच आज ठाण्याचा विकास साधला गेला, असेही ते म्हणाले.ठाणे महापालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराकरिता आयोजित विकास संकल्प सभेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, जयस्वाल यांना मुख्यमंत्री कार्यालयाऐवजी ठाण्याचा विकास करायला धाडले होते. त्यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून दलालांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे बिथरलेल्या दलालांनी त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या. खुद्द जयस्वाल यांनीच ही माहिती मला फोनवर दिली. आपण दलालांच्या धमक्यांना भीत नाही. मात्र, आपले काही बरेवाईट झाले, तर सरकारने आपल्या पत्नीची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी आपल्याला केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्यामुळेच ठाण्याचा विकास करणे जयस्वाल यांना शक्य झाले आहे. परंतु, याचे श्रेय घेण्याचे काम येथील सत्ताधाऱ्यांनी करू नये, असे खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे हे प्रचारादरम्यानसारखे कल्याण-डोंबिवली महापालिकेला देण्यात येणाऱ्या साडेसहा हजार कोटींचे काय झाले, असा सवाल करतात. परंतु, त्यासाठीच्या अहवालाचे काय झाले, हे सेनेच्या महापौरांनाच विचारा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतातशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत प्रचार करताना काँग्रेस सरकारने मेट्रो आणली असे म्हणतात आणि ठाण्याची मेट्रो शिवसेनेने आणली, असे सांगतात. अशी दुपट्टी भूमिका घेऊन कोणाचेही श्रेय लाटण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला. मुंबईत आणि ठाण्यात मेट्रो आणण्याचे काम आमच्याच सरकाराने केले असून अल्पावधीतच त्या कामाला सुरुवातही झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.