शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
2
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
3
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
4
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
5
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
6
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
7
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
8
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
9
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
10
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
11
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
12
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
13
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
14
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
15
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
16
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
17
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
18
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
19
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
20
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त जयस्वाल यांना ठार मारण्याचे दलालांचे कारस्थान

By admin | Updated: February 12, 2017 02:29 IST

महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता

ठाणे : महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता. परंतु, त्यांनाच दलालांनी ठार मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, त्यामुळेच आज ठाण्याचा विकास साधला गेला, असेही ते म्हणाले.ठाणे महापालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराकरिता आयोजित विकास संकल्प सभेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, जयस्वाल यांना मुख्यमंत्री कार्यालयाऐवजी ठाण्याचा विकास करायला धाडले होते. त्यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून दलालांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे बिथरलेल्या दलालांनी त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या. खुद्द जयस्वाल यांनीच ही माहिती मला फोनवर दिली. आपण दलालांच्या धमक्यांना भीत नाही. मात्र, आपले काही बरेवाईट झाले, तर सरकारने आपल्या पत्नीची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी आपल्याला केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्यामुळेच ठाण्याचा विकास करणे जयस्वाल यांना शक्य झाले आहे. परंतु, याचे श्रेय घेण्याचे काम येथील सत्ताधाऱ्यांनी करू नये, असे खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे हे प्रचारादरम्यानसारखे कल्याण-डोंबिवली महापालिकेला देण्यात येणाऱ्या साडेसहा हजार कोटींचे काय झाले, असा सवाल करतात. परंतु, त्यासाठीच्या अहवालाचे काय झाले, हे सेनेच्या महापौरांनाच विचारा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतातशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत प्रचार करताना काँग्रेस सरकारने मेट्रो आणली असे म्हणतात आणि ठाण्याची मेट्रो शिवसेनेने आणली, असे सांगतात. अशी दुपट्टी भूमिका घेऊन कोणाचेही श्रेय लाटण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला. मुंबईत आणि ठाण्यात मेट्रो आणण्याचे काम आमच्याच सरकाराने केले असून अल्पावधीतच त्या कामाला सुरुवातही झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.