शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

अटी, शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी : सदाभाऊ खोत

By admin | Updated: June 22, 2017 19:05 IST

कोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन आॅक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - कोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन आॅक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
 
कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले की, बुधवारी रात्रीसुद्धा कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात पुन्हा मुख्यमंत्र्यांसमवेत आमची बैठक झाली. अटी व शर्थीही रद्द करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. पाच एकरावरीलही सर्व थकबाकीदार कर्जदारांचाही योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण यात राहिलेली नाही. २00८ मध्ये झालेली कर्जमाफी आणि आताच्या कर्जमाफीच्या निर्णयात खूप फरक आहे. त्यावेळची पाच एकराच्या आतील ३६ लाख ७९ हजार शेतकºयांना ६ हजार ९00 कोटीची कर्जमाफी दिली होती. आता जवळपास त्यात तिप्पट वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकºयांना आम्ही या योजनेत सामावून घेतले आहे. 
 
ते म्हणाले की, कर्जमाफीचा निर्णय शेतकºयांसाठी ‘सलाईन’सारखा आहे. शेतीचे प्रश्न यातून सुटणार नाहीत. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. मुबलक पाणीसाठे तयार करणे, पीकपद्धतीचे योग्य नियोजन, बाजारातील पूरक स्थिती, सुविधा आदी गोष्टींवर काम करावे लागेल. त्यादृष्टीने सरकार उपायोजना करीत आहोत. राज्यभर गोदामे व शीतगृहांचे जाळे तयार करण्याबाबत विचार सुरू आहे. बाजार समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी लवकरच अधिकाºयांचे पथक राजस्थानला भेट देऊन तेथील यंत्रणेचा अभ्यास करणार आहे. बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत. सभापती व संचालकांच्या निवडी आता शेतकरी करणार आहेत. त्याचबरोबर राजकीय दबाव कमी करण्यासाठी यापुढे सचिवपदावर शासनाचा अधिकारी नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे.
 
सांगलीत हवामान केंद्र-
येत्या जुलैपासून सांगलीत हवामान केंद्र सुरू होणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हास्तरावर केंद्र झाल्यामुळे शेतकरी व अन्य घटकांना याचा फायदा होईल, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
 
शेतीमालासाठी बोगी-
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी नुकतीच आम्ही चर्चा झाली आहे. आम्ही लांब पल्ल्याच्या प्रत्येक एक्सप्रेसमध्ये शेतीमालासाठी स्वतंत्र बोगी (डबा) जोडण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला आहे. त्यास प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे खोत यांनी सांगितले.
 
तृणधान्य, कडधान्यही नियमनमुक्त-
भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर आता तृणधान्य, कडधान्याही नियमनमुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे खोत म्हणाले.