शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:59 IST

राज ठाकरे यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. परंतु, काही ठिकाणी मत मोजणीत मतांच्या बेरजेत गोंधळ आढळून आला. त्यामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनवरील संशय अधिकच वाढला आहे. ईव्हीएमला आधीपासूनच विरोध होत होता. परंतु, आता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाला धार येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही जागा लढवली नाही. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपने २०१४ पेक्षा यावेळी मोठे यश मिळवले. त्यामुळे विरोधकांचा हिरमोड झाला. मात्र, भाजपचा विजय हा ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या.

राज यांनी ईव्हीएमसंदर्भात विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. राज यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे.

राज यांच्या पाठिशी मोठमोठी आंदोलने उभारण्याचा अनुभव आहे. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा यामुळे राज ठाकरे देशभरात गाजले होते. मराठीच्या मुद्दावर राज यांनी २००९ मध्ये मोठे यश मिळाले होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांची वाताहत झाली. त्यात मनसेची स्थिती काही वेगळी नव्हती.

दरम्यान अपयश विसरून राज ठाकरे पुन्हा एकदा मोठ आंदोलन उभारण्याच्या तयारीला लागले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना नवीन कार्यक्रमही दिला आहे. वास्तविक पाहता, निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी लोकसभेत कायदा बनवावा लागणार आहे. त्याशिवाय बॅलेट पेपरवर निवडणुका होणे शक्य नाही. तसेच भाजपच लोकसभेतील संख्याबळ पाहता ईव्हीएम बंद होण्याची शक्यता कमीच आहे. तरी देखील राज ठाकरे ईव्हीएमविरोधी जन आंदोलन उभं करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तीन महिन्यावर आलेली विधानसभा निवडणूक नव्हे तर ईव्हीएमविरोधी आंदोलनच मनसेच्या रडावर दिसत आहे.