शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:59 IST

राज ठाकरे यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. परंतु, काही ठिकाणी मत मोजणीत मतांच्या बेरजेत गोंधळ आढळून आला. त्यामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनवरील संशय अधिकच वाढला आहे. ईव्हीएमला आधीपासूनच विरोध होत होता. परंतु, आता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाला धार येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही जागा लढवली नाही. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपने २०१४ पेक्षा यावेळी मोठे यश मिळवले. त्यामुळे विरोधकांचा हिरमोड झाला. मात्र, भाजपचा विजय हा ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या.

राज यांनी ईव्हीएमसंदर्भात विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. राज यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे.

राज यांच्या पाठिशी मोठमोठी आंदोलने उभारण्याचा अनुभव आहे. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा यामुळे राज ठाकरे देशभरात गाजले होते. मराठीच्या मुद्दावर राज यांनी २००९ मध्ये मोठे यश मिळाले होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांची वाताहत झाली. त्यात मनसेची स्थिती काही वेगळी नव्हती.

दरम्यान अपयश विसरून राज ठाकरे पुन्हा एकदा मोठ आंदोलन उभारण्याच्या तयारीला लागले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना नवीन कार्यक्रमही दिला आहे. वास्तविक पाहता, निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी लोकसभेत कायदा बनवावा लागणार आहे. त्याशिवाय बॅलेट पेपरवर निवडणुका होणे शक्य नाही. तसेच भाजपच लोकसभेतील संख्याबळ पाहता ईव्हीएम बंद होण्याची शक्यता कमीच आहे. तरी देखील राज ठाकरे ईव्हीएमविरोधी जन आंदोलन उभं करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तीन महिन्यावर आलेली विधानसभा निवडणूक नव्हे तर ईव्हीएमविरोधी आंदोलनच मनसेच्या रडावर दिसत आहे.