शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

मुंबई : पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय ‘सृष्टीमित्र’ स्पर्धा पारितोषिक वितरण व पर्यावरण विषयक ‘वसुंधरा लघुचित्रपट’ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, पर्यावरण विभागाचे संचालक बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले की, ‘२५ वर्षे शासनाची सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना एक वेगळाच आनंद आहे.’ कर्मचाऱ्यांनी महामंडळाची दीर्घ सेवा करून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सेवानिवृत्तीनंतरही सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव सत्कार आणि अभिव्यक्ती सृष्टीमित्र मंडळाच्या पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच २०१५ साली घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. (प्रतिनिधी)>प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच पेन्शनशासन आणि प्रशासन एकाच रथाची दोन चाके आहेत. शासन आणि प्रशासन यांनी समन्वयाने कार्य केले, तर विकासाचा वेग अधिक गतीने वाढतो. प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचारी दीर्घकालीन शासनाची सेवा करतात, परंतु त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल आणि यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे रामदास कदम यांनी सांगितले.