शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

तंबाखूमुक्तीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 02:06 IST

सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले

मुंबई : सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. संपूर्ण राज्य तंबाखूमुक्त होत नाही; तोवर राज्यात तंबाखूमुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.सलाम मुंबई फाउंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन यांच्या वतीने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तंबाखू नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेसह व्यक्तींच्या कामास पाठिंबा देण्यास आणित्यांच्या कार्याच्या गौरवाकरिताआयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.सुप्रिया म्हणाल्या, तंबाखूसेवनाच्या घातक परिणामाची जाणीव करून देणाऱ्या जाहिराती सर्वत्र दिसून येतात. तरीदेखील राज्य तंबाखूमुक्त होताना दिसून येत नाही. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत: पुढाकार घेऊन तंबाखू खाणे आणि खाण्यापासून रोखले, तरच राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल.प्रतापगढमधील तरुण चेतना, छत्तीसगढमधील जनस्वास्थ सहयोग, मध्य प्रदेशातील सटाणा दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि जालना निर्माण विकास संस्था या स्वयंसेवी संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला. तसेच धुळे येथील डॉ. सतीश पाटील, सांगली येथील लक्ष्मण शिंदे, मुंबईतील वर्षा विद्या विलास, रत्नागिरीमधील सिद्धेश्वर ढोके, कोल्हापूरमधील संजय मोहिते, अमरावतीमधील सुरेश रहाटे, यवतमाळ येथील चंद्राबोधी घायवटे, अवधूत वानखेडे, नंदुरबार येथील मल्लिनाथ कलशेट्टी यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता अंकित मोहन उपस्थित होते.