शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बीफ खाण्याचा सर्वांना अधिकार - रामदास आठवले

By admin | Updated: July 14, 2017 20:12 IST

गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, बीफ खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, बीफ खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत. 
देशात गोमांस किंवा जनावरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणीत अनेकांनी आपल्या जीव गमवावा लागला आहे. यावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की,  बीफ खाण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका. तसेच, गोरक्षकाच्या नावाखाली कोणालाही मरेस्तोवर मारहाण करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. 
(गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या)
(VIDEO- गोमांस बाळगल्याचा संशय, नागपुरात भाजपा कार्यकर्त्यास बेदम मारहाण)
(गोमांसावरून झारखंडमध्ये आणखी एकाची हत्या)
देशभरात कथित गोरक्षकांकडून अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती. असे प्रकार यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही मारहाणीच्या घटना थांबल्या नाहीत. या घटनांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तुम्हाला पोलिसांकडे जाण्याचा अधिकार आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
जनावरांची वाहतूक आणि गोमांस बाळगल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांकडून मारहाणीत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून देशातील राजकारणही तापले आहे. विरोधकांकडून सातत्याने नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. या घटनांना सत्ताधारी भाजप कारणीभूत असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून केला जात आहे.